AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना काळात कामी येतील ‘या’ आयुर्वेदिक टिप्स, वाचा याचे महत्त्वपूर्ण फायदे…

देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे फार महत्वाचे झाले आहे.

कोरोना काळात कामी येतील 'या' आयुर्वेदिक टिप्स, वाचा याचे महत्त्वपूर्ण फायदे...
| Updated on: Apr 07, 2021 | 2:10 PM
Share

मुंबई : देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे फार महत्वाचे झाले आहे. बहुतेक लोक यासाठी आयुर्वेदिक औषधी वनस्पतींवर अवलंबून आहेत, कारण रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदात त्यांची मोठी भूमिका मानली जाते. सध्या कोरोना महामारीच्या काळात जो-तो आपल्या कुटुंबासह स्वतःची काळजी घेण्यात व्यस्त आहे. (Follow these ayurvedic tips to boost immunity during Corona period)

या सगळ्यासोबत कोरोनापासून बचावासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे ‘रोगप्रतिकारक शक्ती’. रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी, याविषयी सगळेच संभ्रमात असतात. यातही विशेषतः शाकाहारी लोकांना कायम याचा विचार करावा लागतो. त्यामुळे आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या 5 शाकाहारी घटकांची माहिती जाणून घेणार आहोत.

अश्वगंधाचे बरेच आरोग्यवर्धक फायदे आहेत. परंतु, प्रत्येक रोगात अश्वगंधाचे सेवन करण्याचा मार्ग देखील वेगळा आहे. अशा परिस्थितीत तुम्ही अश्वगंधाचे सेवन करत असाल, तर प्रथम त्याबद्दल जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्या व नंतरच त्याचे सेवन करा. अश्वगंधाच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढते, पांढरे केस, डोळ्यांची दृष्टी सुधारणे, घशा संबंधित आजार, टीबी रोग, खोकला, छातीत दुखणे इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो.

काळी मिरीप्रमाणेच हळद देखील एक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट आहे. हळदीत अँटी-इंफ्लेमेटरी घटक आहेत. जर आपल्याला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल, तर हळदीचे दूध पिणे फायदेशीर ठरते. यामुळे पडश्यात आराम पडतो. काळ्या तीळाप्रमाणे दिसणारा कलौंजी हा मसाल्यातील घटक रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यातदेखील खूप मदत करतो. यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत.

सर्दी, सर्दी, खोकला, घसा दुखणे यासारखे लक्षणेही कोरोना मानली जातात. या सर्व अडचणी दूर करण्यासाठी प्रतिजैविक असल्याने ते अँटीऑक्सिडेंट्सने परिपूर्ण आहेत. संसर्ग रोखण्याव्यतिरिक्त, श्वसनविषयक समस्या दूर करण्यात मदत होते. तसेच फुफ्फुसातील ताठर कफ काढून टाकते. तुम्ही एका कप पाण्यात मद्याकरिता उकळवा आणि पाणी अर्धे शिल्लक असेल तर ते फिल्टर करून चहासारखे प्या.

सर्वात आधी काढा बनवण्यासाठी काढ्याच्या प्रमाणात एकूण सामुग्रीपटीत चार भाग तुळशीची पानं, दो भाग दालचिनी, दोन भाग सुंठ आणि एक भाग काळे मिरे घ्या. हे सर्व एकत्र वाटून त्याची पावडर बनवा. त्याच्यापासून 3 ग्रॅमची टी-बॅग किंवा 500 मिलिग्रॅम पावडरच्या गोळ्या तयार करा. दिवसातून एक किंवा दोन वेळा याला 150 मिलीलिटर उकळलेल्या पाण्यात घालून चहासारखं प्या.

(टीप : वरील लेख हा सामान्य माहितीवर आधारित आहे.  उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)

संबंधित बातम्या : 

(Follow these ayurvedic tips to boost immunity during Corona period)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली