भोपाळपासून फक्त 200 किमी अंतरावर असलेल्या ‘या’ हिल स्टेशनला द्या भेट, पर्यटकांची आहे पहिली पसंती

कडक उन्हापासून आराम मिळवण्यासाठी थंड ठिकाण शोधत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला हिमाचल किंवा उत्तराखंड नव्हे तर मध्य प्रदेशातील एका हिल स्टेशनबद्दल सांगत आहोत, जे काश्मीरपेक्षा कमी नाही. त्याची खासियत काय आहे आणि इथे कसे पोहोचायचे ते आपण जाणून घेऊयात...

भोपाळपासून फक्त 200 किमी अंतरावर असलेल्या या हिल स्टेशनला द्या भेट, पर्यटकांची आहे पहिली पसंती
Mini kashmir aka pachmarhi is 200 km away from bhopal plan a trip
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 30, 2025 | 7:30 PM

आपल्या भारतातील काही भागांमध्ये म्हणजेच दिल्लीपासून उत्तर प्रदेशपर्यंत तसेच बहुतेक शहरांमध्ये सध्या तीव्र उष्णता जाणवत आहे. पारा 40 च्या पुढे गेला आहे. त्यामुळे बरेच लोक थंड ठिकाणांकडे जाण्याचा प्लॅन करत आहेत. जर तुम्हालाही या कडक उन्हापासून आराम मिळवायचा असेल, किंवा फिरायला जायचे असेल तर तुम्ही मध्य प्रदेशातील पचमढी या हिल स्टेशनला भेट देण्याचा प्लॅन करू शकता. पचमढीला मिनी काश्मीर असेही म्हणतात. घनदाट जंगले, धबधबे, गुहा आणि हिरवळीने भरलेले हे छोटे हिल स्टेशन उन्हाळ्यात पर्यटकांची पहिली पसंती बनत आहे.

समुद्रसपाटीपासून सुमारे 1100 मीटर उंचीवर असलेल्या पचमढीचे तापमान जून-जुलैमध्येही इतर ठिकाणांपेक्षा खूपच कमी राहते, जे येथील सर्वात मोठ्या वैशिष्ट्यांपैकी एक आहे. पचमढीमध्ये असे काय खास आहे की त्याला ‘मिनी काश्मीर’ म्हटले जाते आणि उन्हाळ्यात हे ठिकाण भेट देण्यासाठी एक परिपूर्ण पर्याय का आहे ते जाणून घेऊया.

पचमढीला ‘मिनी काश्मीर’ का म्हणतात?

पचमढीला ‘मिनी काश्मीर’ असे म्हणतात कारण येथील हवामान, हिरवळ आणि नैसर्गिक सौंदर्य काश्मीरपेक्षा कमी नाही. सातपुडा टेकड्यांनी वेढलेले हे हिल स्टेशन घनदाट जंगले, धबधबे, गुहा आणि शांत वातावरण आहे, जे प्रत्येक पर्यटकाला आकर्षित करते. उन्हाळ्यात, जेव्हा देशाच्या बहुतेक भागात तीव्र उष्णता असते, तेव्हा पचमढीतील हवामान थंड आणि आल्हाददायक राहते. येथील दऱ्या, ताजी हवा आणि सूर्यास्त हे सगळं पाहणे एकदम मनमोहक आहे. म्हणूनच लोक त्याला प्रेमाने ‘मिनी काश्मीर’ म्हणू लागले आहेत.

पचमढी येथे भेट देण्याची ठिकाणे

पचमढीचा बी फॉल्स हा सर्वात लोकप्रिय धबधब्यांपैकी एक आहे. येथील पाण्याचा आवाज मधमाशांच्या गुंजनासारखा वाटतो. येथे तुम्ही पोहू शकता आणि पिकनिक करू शकता.

जर तुम्हाला सूर्यास्त पहायचा असेल तर तुम्ही धूपगडला जाऊ शकता. हे सातपुड्याचे सर्वात उंच शिखर आहे, जिथून सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दृश्य अद्भुत दिसते. फोटोग्राफी प्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही.

येथे पाहण्यासाठी पांडव गुहा देखील आहेत. असे मानले जाते की महाभारतातील पांडवांनी त्यांच्या वनवासात या गुहांमध्ये राहिले होते.

काय करावे आणि कुठे राहावे?

पचमढीमध्ये जंगल सफारी, ट्रेकिंग, नेचर वॉक अशा अनेक अँडव्हेंचर उपक्रमांचा आनंद घेता येतो. जर तुम्हाला काही दिवस शांतता आणि निसर्गाच्या सानिध्यात घालवायचे असतील तर हे ठिकाण परिपूर्ण आहे. एमपी टुरिझमचे अनेक रिसॉर्ट्स आणि खाजगी हॉटेल्स येथे उपलब्ध आहेत जे बजेटपासून ते लक्झरी श्रेणीपर्यंत आहेत.

कसे पोहोचायचे?

पचमढीचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन पिपरिया आहे, जे सुमारे 50 किमी अंतरावर आहे. येथून टॅक्सी किंवा बसने पचमढीला सहज पोहोचता येते. सर्वात जवळचे विमानतळ भोपाळ आहे, जे सुमारे 200 किमी अंतरावर आहे. मार्च ते जुलै आणि त्यानंतर ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ पचमढीला भेट देण्यासाठी सर्वात योग्य काळ मानला जातो.