AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्किंग पेरेंट्समुळे मुलांकडे दुर्लक्ष होतंय? या 5 स्मार्ट टिप्समुळे मुलांची योग्य काळजी घ्या!

वर्किंग पेरेंट्ससाठी वेळेचं व्यवस्थापन हे मोठं आव्हान असलं, तरी योग्य नियोजन आणि संवादाच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलांची योग्य काळजी घेऊ शकता. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण तुमच्यासोबत असावेत, यासाठी हे 5 उपाय नक्कीच उपयोगी ठरू शकतात.

वर्किंग पेरेंट्समुळे मुलांकडे दुर्लक्ष होतंय? या 5 स्मार्ट टिप्समुळे मुलांची योग्य काळजी घ्या!
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: Jitendra Zavar | Updated on: Jun 21, 2025 | 2:11 PM
Share

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये पालकांची कामं वाढली आहेत. दोघंही वर्किंग असल्याने मुलांच्या संगोपनासाठी वेळ देणं कठीण झालं आहे. याचा परिणाम त्यांच्या वाढीवर, स्वभावावर आणि संस्कारांवर होऊ शकतो. अनेकदा आई-वडिलांच्या अनुपस्थितीत मुलं चुकीच्या गोष्टींकडे वळतात. त्यामुळे वर्किंग पेरेंट्सने काही खास गोष्टी लक्षात ठेवूनच मुलांची काळजी घेणं आवश्यक आहे.

1. मुलांना आजी-आजोबांच्या सहवासात ठेवा

मुलांना पूर्णवेळ एकटं ठेवणं टाळा. शक्य असल्यास त्यांना आजी-आजोबांसोबत ठेवा. त्यामुळे ते सुरक्षितही राहतील आणि त्यांना चांगले संस्कारही मिळतील. आजी-आजोबांबरोबर राहिल्यानं मुलं भावनिकदृष्ट्या मजबूत बनतात. ते आपल्या अनुभवांतून मुलांना खूप काही शिकवू शकतात.

2. मुलांसाठी ठराविक दिनक्रम ठरवा

जर तुम्ही ऑफिसला जात असताना मुलं घरातच असतील, तर त्यांच्यासाठी एक नियमित वेळापत्रक तयार करा. त्यात खाणं, अभ्यास, झोप, खेळ यांचा समावेश असावा. यामुळे मुलं शिस्तीत राहतील आणि वेळेचा योग्य उपयोग करतील. याशिवाय, त्यांच्या वस्तू नेहमी ठराविक जागी व्यवस्थित ठेवाव्यात जेणेकरून तुम्ही नसतानाही त्यांना अडचण येणार नाही. दररोज एक वेळ ठरवून त्यांच्याशी फोनवर संवाद साधणंही महत्त्वाचं आहे.

3. घरात CCTV कॅमेरा बसवा

पालकांनी घरात CCTV कॅमेरा बसवणं एक योग्य पाऊल ठरू शकतं. विशेषतः जेव्हा मुलं एकटीच असतात, तेव्हा त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा उपयुक्त ठरतो. त्याचा अ‍ॅक्सेस आई-वडील दोघांच्या मोबाईलमध्ये असावा. एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, तर तुम्ही तत्काळ मदत करू शकता.

4. मुलांशी खुलं संवाद साधा

तुमचं वर्क शेड्यूल कितीही व्यस्त असलं तरी मुलांशी मनमोकळं बोलणं आवश्यक आहे. त्यांना तुमच्या व्यस्ततेचं कारण समजावून सांगा. मुलं आजकाल समजूतदार आहेत, त्यांना हे पटू शकतं. काम, मेहनत, आणि जबाबदाऱ्या यांची जाणीव लहान वयातच झाल्यास ते भविष्यात अधिक जबाबदार होतात.

5. सुट्ट्यांमध्ये मुलांसोबत वेळ घालवा

तुम्हाला सुट्टी मिळाल्यावर ती पूर्णपणे कुटुंबासाठी राखून ठेवा. मुलांसोबत फिरायला जा, घरातच खेळा, किंवा त्यांना बाहेर जेवायला घेऊन जा. या वेळात केवळ त्यांचं ऐका, त्यांना समजून घ्या. असा वेळ मुलांसाठी खूप मौल्यवान ठरतो आणि त्यांना तुमच्याशी एक भावनिक जोड मिळते.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत