मुंबई : विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या उन्हाचा कहर सुरु आहे. नागपुरात काल 47.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. तर चंद्रपुरात आज देशातील सर्वोच्च 48 सेल्सिअस तापमानाचा नोंद करण्यात आली आहे. गेल्या 15 वर्षातील हे दुसरं सर्वोच्च तापमान आहे. गेल्या आठवड्याभरापासून राज्यात उन्हाचा तखाडा पाहायला मिळतो आहे. लोकच नाही तर पशू-पक्षीही गर्मीने हैरान झाले आहेत. तर पुढील काही दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
वाढत्या तापमानामुळे विदर्भात तसेच महाराष्ट्रात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नागपुरात गेल्या 48 तासात उष्माघाताने 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता उष्माघातापासून बचाव करणे अत्यंत आवश्यक झालं आहे. त्यामुळे उष्माघात होऊ नये यासाठी काय करावं, उष्माघाताची लक्षणं काय आणि उष्माघातावर काय उपचार करावा हे माहीत असणे गरजेचं आहे.
उष्माघाताची लक्षणं कशी ओळखाल?
जर कधी तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या कुणामध्ये ही वरील लक्षणं दिसून आली. तर त्याला उष्माघाताचा त्रास होतो आहे हे समजावं आणि त्याला तातडीने उपचार उपलब्ध करुन द्यावी.
उष्माघातावर काय उपचार कराल?
उष्माघातापासून बचाव होण्यासाठी काय करावे?
उष्माघात होऊनये यासाठी त्यापासून स्वत:चा बचाव करणे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे उन्हात बाहेर जाणं टाळा, गरज असेल तेव्हाच बाहेर पडा, बाहेर जाताना नेहमी डोकं आणि शरीर कपड्याने झाकलेलं असावं हे सुनिश्चित करा, पाणी पित राहा, थंड पदार्थांचं सेवन करत राहा. सावधानता बाळगा आणि या उन्हाळ्यात सुरक्षित राहा.