AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लहान वयातच मुलांना शिकवा ‘या’ गोष्टी, अन्यथा होईल पश्चाताप

लहान मुलांसोबत आपण देखील कधी लहान होऊन जातो हे आपल्यालाही कळत नाही. पण लहान वयातच मुलांना वळण लावणे गरजेचे असते. ज्याचा फायदा त्यांना पुढील जीवनात होतो.

लहान वयातच मुलांना शिकवा 'या' गोष्टी, अन्यथा होईल पश्चाताप
| Edited By: | Updated on: Nov 10, 2024 | 5:27 PM
Share

घरात लहान मुले असली की घरात खेळीमेळीचे वातावरण असते. लहान मुलांसोबत आपण देखील कधी लहान होऊन जातो हे आपल्यालाही कळत नाही. पण लहान मुलं ही वेळेबरोबर मोठी होणार असतात, हे पालक म्हणून आपण विसरून जातो. अनेक वेळा काही गोष्टी आपण मुलांना सांगायच्या टाळतो.

वयाची 12 वर्षे उलटल्यानंतर मुलांचा किशोरवयीन प्रवास सुरू होतो. बारा वर्षांपर्यंतचे वय मुलांच्या आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. या आधी शिकलेल्या गोष्टी त्यांना त्यांचे पुढील विचार तयार करण्यात मदत करतात. अशा परिस्थितीत काही गोष्टी आहेत ज्या मुलांना बारा वर्षांपूर्वी शिकवल्या पाहिजेत. चला तर मग प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना बारा वर्षे पूर्ण होण्यापूर्वी कोणत्या गोष्टी शिकवल्या पाहिजे, हे जाणून घेऊया.

इतरांचा आदर करणे : मुलांना इतरांचा आदर करायला शिकवा. मग ते मोठे असोत किंवा लहान. त्यांना समजावून सांगा की प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे आणि त्यांची स्वतःची मते आहेत.

सकारात्मक विचार : मुलांना हे समजावून सांगा की सकारात्मक विचाराने ते कोणत्याही कठीण परिस्थितीला तोंड देऊ शकतात. मुलांना सकारात्मक विचार करण्यास प्रोत्साहित करा.

अपयशातून शिकणे : अपयश हा जीवनाचा एक भाग आहे हे मुलांना समजावून सांगा. त्यांनी अपयशाने निराश होऊ नये तर त्यातून शिकून पुढे जावे.

आत्मविश्वास : मुलांना त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला सांगा. मुलांना लहान ध्येय ठेवण्यासाठी आणि ते गाठण्यासाठी प्रोत्साहित करा. जीवनातील आव्हानांचा सामना करण्यास आत्मविश्वास सक्षम करतो हे मुलांना पटवून द्या. मुलांना ते काय करू शकतात आणि काय करू शकत नाही ते समजावून सांगा.

जबाबदारीचे जाणीव करून द्या : मुलांना जबाबदारीची जाणीव करून द्या त्यांना घरातील छोट्या मोठ्या कामांमध्ये सहभागी करून घ्या. ज्यामुळे ते जबाबदारी घ्यायला शिकतील.

Follow Us
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...