AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त लक्षद्वीपच नाही, तर भारतातील ‘या’ सुंदर राज्यांमध्ये फिरायला जाणाऱ्यांना परमिटशिवाय एन्ट्री नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर लक्षद्वीप बेट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पण या सुंदर ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला परमिट घ्यावं लागतं. मात्र केवळ लक्षद्वीपच नाही तर भारतातील अशी अनेक राज्ये आहेत, जिथे फिरायला जाण्यासाठी तिथल्या स्थानिक प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते.

फक्त लक्षद्वीपच नाही, तर भारतातील 'या' सुंदर राज्यांमध्ये फिरायला जाणाऱ्यांना परमिटशिवाय एन्ट्री नाही
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 12, 2024 | 10:36 PM
Share

आपल्याला विदेशात फिरायला जायचं असलं तर आपल्याला पासपोर्ट आणि विजाची फार आवश्यकता असते. त्याशिवाय आपण आपल्याला हव्या असणाऱ्या देशात फिरायला जाऊ शकत नाही. या कागदपत्रांचं असणं बंधनकारक असण्यामागील कारण म्हणजे सुरक्षा. त्यामुळे तुम्ही कोणत्याही कामासाठी जा किंवा फिरायला जा, तुम्हाला त्या देशाचा विजा मिळणं आवश्यक असतं. तसेच तुमचा पासपोर्टदेखील महत्त्वाचा असतो. असं म्हटलं जातं की आपल्याला देशात फिरण्यासाठी पासपोर्ट किंवा कुठल्याही विजाची आवश्यकता नाही. अर्थात हे खरं आहे. पण भारतातील काही भागांमध्ये फिरायला जायतं असेल तर तुम्हाला विशेष परवानगी घ्यावी लागेल हे देखील तितकंच खरं आहे.

भारतातील असे काही निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहेत जिथे तुम्हाला फिरायला जायचे असेल तर विशेष परवानगी घेणं बंधनकारक आहे. सुरक्षेच्या कारणासाठी ही परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे तुम्ही अशा ठिकाणी प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तुमची सर्व कागदपत्रे तयार असल्याची खात्री करा आणि प्रशासनाची इनर लाइन परमिट मिळवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर लक्षद्वीप बेट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पण या सुंदर ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला परमिट घ्यावं लागतं. मात्र केवळ लक्षद्वीपच नाही तर भारतातील अशी अनेक राज्ये आहेत, जिथे फिरायला जाण्यासाठी तिथल्या स्थानिक प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते.

अरुणाचल प्रदेश

उत्तर-पूर्वेकडील विविध संस्कृतीने समृद्ध असलेले हे राज्य आहे. अरुणाचल प्रदेशाच्या सीमा या चीन, भूतान आणि म्यानमार अशा तीन देशांशी संलग्न आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षतेसाठी संबंधित परिसरात जाण्यासाठी परवानगी घेणं महत्वाचे आहे. सोबतचं कोलकाता, शिलाँग, गुवाहाटी, दिल्ली यांसारख्या सुंदर शहरांमध्येदेखील फिरण्यासाठी तुम्हाला इनर लाइन परमिटची आवश्क्यता असते. परमिटची वेळ मर्यादा 30 दिवसांचा असतो. या काळात तुम्हाला सोबत आवश्यक महत्त्वाची कागदपत्र सोबत ठेवणे हे बंधनकारक असतं.

नागालँड

नागालँड हे राज्य अनेक जमातींचे निवासस्थान आहे. नागालँडपासून म्यानमारची आंतरराष्ट्रीय सीमा जवळ आहे. त्यामुळे तो परिसर संवेदनशील क्षेत्र मानला जातो. इथे फिरायला जाण्यासाठी तुम्हाला दिल्ली, कोलकाता, कोहिमा, दिमापूर, शिलाँग आणि मोकोकचुंग येथील उपायुक्तांकडून इनर लाइन परमिट तुम्हाला मिळू शकते. तसेच पॅन कार्ड आणि मतदार कार्ड या साह्याने तुम्हाला परवानगी मिळेल. इथे तुम्हाला 15 दिवसांच्या परमिटसाठी 50 रुपये आणि 30 दिवसांसाठी 100 रुपये खर्च करावे लागतील.

लडाख

लडाखमधील जमू-काश्मीरला लागून पाकिस्तानची सीमा असल्याने लडाखच्या काही भागांना भेट देण्यासाठी देखील परमिट अत्यंत आवश्यक आहे. हनु व्हिलेज, पँगॉन्ग त्सो लेक, त्सो मोरीरी लेक, न्योमा, लोमा बेंड आणि खारदुंग यांसारख्या ठिकाणी भेट देण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. पाकिस्तानची सीमा असल्याने तिथे लोकांना संपूर्ण लडाख फिरण्यास सक्त मनाई आहे. लडाखमध्ये फिरण्यासाठी फक्त एका दिवसाचे परमिट तुम्ही डीसी ऑफिसमधून घेऊ शकता.

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?