पावसाळ्यात हिरवा निसर्ग खुणावतोय, ‘या’ ठिकाणांना द्या भेट

पावसाळ्यात डोंगर भागांमध्ये फिरणे जरी अनोखे असले, तरी त्यात भूस्खलन आणि वातावरणात होणारे अचानक बदल यामुळे प्रवास रद्द करावा लागतो. मात्र आपल्या भारतात काही अशी ठिकाणं आहेत जी सुरक्षित मानली जातात. चला या ठिकाणांबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

पावसाळ्यात हिरवा निसर्ग खुणावतोय, या ठिकाणांना द्या भेट
monsoon picnic
| Edited By: | Updated on: Jul 01, 2026 | 12:16 AM

पावसाळा सुरू होताच निसर्गाचे सौंदर्य अधिकच वाढते. सभोवतालची हिरवळ, ढगांनी वेढलेल्या टेकड्या, धबधबे आणि थंडगार वारा हे सर्व या ऋतूत पाहण्याचा आनंद वेगळाच असतो. अशावेळेस अनेक लोकं पावसाळ्यात निसर्गाला भेट देण्यासाठी फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. तसेच पावसाळ्यात डोंगराळ भागातील हवामान झपाट्याने बदलू शकते. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, निसरडी परिस्थिती आणि दरड कोसळणे यांसारख्या समस्या देखील उद्भवू शकतात, ज्यामुळे प्रवासात व्यत्यय येऊ शकतो.

त्यामुळे पावसाळ्यात डोंगर भागांमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन काळजीपूर्वक करणे महत्त्वाचे आहे. तसेच फिरायला जाण्यापूर्वी हवामानाची माहिती घेणे, स्थानिक लोकांकडून ठिकाणाची माहिती घ्या आणि योग्य ठिकाण निवडणे हे सुरक्षित प्रवासासाठी महत्त्वाचे ठरेल. योग्य पूर्व तयारीने, पावसाळ्यातही डोंगराळ भागातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येतो. चला तर मग जाणून घेऊया की पावसाळ्यात कोणत्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करावा तसेच ही ठिकाणे आदर्श का मानली जातात आणि आपल्या प्रवासादरम्यान कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात. याबद्दल जाणून घेऊयात.

पावसाळ्यात तुम्ही या ठिकाणांना भेट देण्याचे प्लॅन करू शकता

माउंट अबू (राजस्थान)

राजस्थानचे एकमेव थंड हवेचे ठिकाण असलेले माऊंट अबू येथील हिरवीगार वनराई आणि आल्हाददायक पावसाळी हवामानासाठी प्रसिद्ध आहे. येथे पर्यटक येथे नक्की तलाव, दिलवारा जैन मंदिर, गुरु शिखर, सनसेट पॉइंट व हनीमून पॉइंट यांसारख्या नैसर्गिक सौंदर्या असलेल्या ठिकाणांना भेट देऊ शकतात.

पाचमढी (मध्य प्रदेश)

सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले पाचमढी पावसाळ्यात अत्यंत मनमोहक दिसते. बी फॉल्स, धूपगड, जटाशंकर लेणी, पांडव लेणी आणि अप्सरा विहार ही येथील प्रमुख ठिकाणं पर्यटकांसाठी आकर्षणे आहेत. हिरवीगार वनराई आणि धबधब्यांच्या सान्निध्यात ट्रेकिंग आणि निसर्ग भ्रमंती करणे हा देखील एक अनोखा अनुभव देतो.

येरकौड (तामिळनाडू)

तामिळनाडूमधील येरकौड हे एक शांत थंड हवेचे ठिकाण असून ते नैसर्गिक सौंदर्य आणि कॉफीच्या मळ्यांसाठी ओळखले जाते. येरकौड तलाव, लेडीज सीट, पॅगोडा पॉईंट, किलियूर धबधबा आणि बॉटनिकल गार्डन्स ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. पावसाळ्यात येथील हवामान अधिकच आल्हाददायक होते.

कुर्ग (कर्नाटक)

कुर्गला ‘भारताचे स्कॉटलंड’ म्हणूनही ओळखले जाते. पावसाळ्यात येथील कॉफीचे मळे आणि हिरवीगार वनराई मनमोहक दिसते. ॲबी फॉल्स, राजा सीट, दुबारे एलिफंट कॅम्प, नामद्रोलिंग मठ (सुवर्ण मंदिर) आणि कॉफीचे मळे ही भेट देण्यासारखी लोकप्रिय ठिकाणे आहेत. प्रवासाला निघण्यापूर्वी येथील हवामानाची माहिती नक्की तपासा.

अरकू व्हॅली (आंध्र प्रदेश)

अरकू व्हॅली तिच्या हिरव्यागार दऱ्या, धबधबे आणि कॉफीच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. बोरा लेणी, कॉफी संग्रहालय, पद्मपुरम गार्डन्स, अनंतगिरी टेकड्या आणि चपराई धबधबे ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत. पावसाळ्यात या ठिकाणच्या नैसर्गिक सौंदर्यात आणखी भर पडते.

पावसाळ्यात या ठिकाणी प्रवास करणे अधिक चांगले का मानले जाते?

माउंट अबू, पाचमढी, येरकौड, कुर्ग आणि अरकू व्हॅली यांसारखी ठिकाणे पावसाळ्यातील प्रवासासाठी आदर्श मानली जातात, कारण पावसाळ्यात डोंगराळ गांच्या लनेत भूस्खलनाचा धोका कमी असतो. शिवाय प्रवास अधिक उत्तम होतो.

जर सतत मुसळधार पाऊस किंवा खराब हवामान असेल, तर येथेही धोके वाढू शकतात. त्यामुळे, प्रवासाला निघण्यापूर्वी हवामान, रस्त्यांची स्थिती आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचना नक्की तपासा. योग्य तयारी आणि सावधगिरीने या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्रवास सुरक्षित आणि अविस्मरणीय होऊ शकते.

पावसाळ्यात डोंगराळ भागात प्रवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

पावसाळ्यात डोंगराळ भागात प्रवास करण्यापूर्वी, हवामानाचा अंदाज तपासा आणि मुसळधार पावसाचा इशारा असल्यास आपला प्रवास करणे टाळा. डोंगराळ रस्त्यांवर सावधगिरीने गाडी चालवा आणि रात्रीचा प्रवास टाळा.

आपल्यासोबत अत्यावश्यक औषधे, पिण्याचे पाणी आणि पॉवर बँक ठेवा. कोणतेही प्रतिबंधित किंवा भूस्खलनप्रवण क्षेत्र टाळा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.

Follow Us