Sleep : झोप पूर्ण झाल्यानंतरही आळस येत असेल, तर शरीराच्या ‘ या ‘ भागाला करा मालिश !
जर तुम्हालाही झोप पूर्ण झाल्यावरही नेहमी अंगात आळस येत असेल, तर याचा अर्थ हा की तुमच्या शरीरात अशी एखादी समस्या आहे, ज्यामुळे तुम्हाला थकवा येत आहे.
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत (busy lifestyle) बऱ्याच वेळेस असं होतं की आपली झोप पूर्ण होत नाही. कामाचे तास आणि ताण वाढल्यामुळे उशीरा झोपावे लागते व सकाळी लवकर उठून परत काम सुरू करावे लागते. त्यामुळे बऱ्याच जणांची झोप (enough sleep is important) पूर्ण होत नाही. मात्र काही वेळेस अशी परिस्थिती असते की पुरेशी झोप घेतल्यानंतरही अंगात आळस भरल्यासारखा वाटतो. जर तुम्हालाही झोप पूर्ण झाल्यावरही नेहमी अंगात आळस (laziness) येत असेल, तर याचा अर्थ हा की तुमच्या शरीरात अशी एखादी समस्या आहे, ज्यामुळे तुम्हाला थकवा येत आहे. काही उपायांनी या समस्येपासून मुक्ती मिळू शकते. येथे आम्ही तुम्हाला काही आयुर्वेदिक उपाय सांगू इच्छितो, ज्याचा वापर केल्याने तुम्हाला उत्साहित वाटेल. काही घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊया.
शरीरातील आळस असा पळवून लावा – – आयुर्वेदानुसार तुम्ही रोज 20 ते 25 शरीराला तेलाने मालिश केले पाहिजे. यामुळे शरीराला खूप आराम मिळतो आणि मेंदूही ॲक्टिव्ह मोडमध्ये येतो.
– तसेच तुम्ही रोज सूर्योदयापूर्वी उठले पाहिजे. सकाळी लवकर उठल्याने शरीराला ताजी हवा मिळते. त्यामुळे मेंदूही उत्साहित राहतो. तसेच मेंदू ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी योगासने आणि प्राणायाम करावा.
– सकाळी उठल्यावर मडिटेशन करणे हेही खूप चांगलं आणि फायदेशीर असते. त्यामुळे संपूर्ण शरीर ॲक्टिव्ह होते. रक्ताभिसरण चांगले होते. तसेच तुमची एकाग्रताही वाढते. त्याशिवाय तुमचा रोजचा आहारही चांगला, पौष्टिक ठेवला पाहिजे. पचन चांगले व्हावे यासाठी ताजे, गरम अन्न खावे.
– जास्त वेळ झोपल्यमुळेही शरीरात आळस साठून राहतो. तसेच रात्री उशीरा जेवल्यामुळे आणि उशीरापर्यंत जागे राहिल्यामुळेही शरीरातील उर्जा कमी होते. त्यामुळे लवकर जेवून, लवकर झोपावे व सकाळीही लवकर उठावे.
( टीप- या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व देण्यात आलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )