AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नात नवरदेव घोड्याऐवजी घोडीवर का बसतो? काय आहे त्याच्या मागील कारण

घोडा ऐवजी घोडीच का वापरली जाते? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. घोड्यावर का बसवले जात नाही. त्याच्यामागे तर्क असा मांडला जातो की, घोडा स्वभावाने आक्रमक असतो. त्याला प्रशिक्षण दिल्यावर तो नियंत्रणात राहू शकतो.

लग्नात नवरदेव घोड्याऐवजी घोडीवर का बसतो? काय आहे त्याच्या मागील कारण
नवरदेवाची वरात.Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Mar 06, 2025 | 6:03 PM
Share

लग्न हा भारतीय परंपरेत पवित्र संस्कार आहे. पती अन् पत्नीचे सात जन्माचे बंधनही लग्नास म्हटले जाते. हिंदू धर्मात लग्नाच्या अनेक प्रथा आहेत. लग्नादरम्यान अनेक प्रकारचे विधी केले जातात. त्यापैकी एक म्हणजे घोडीवर बसून लग्नाची मिरवणूक काढली जाते. वर नेहमी घोडीवर स्वार होऊनच वधुला घेण्यासाठी जातो. पण तुम्हाला त्यामागचे कारण माहीत आहे का.

नवरा मुलगा घोडा ऐवजी घोडीवर बसण्याची अनेक कारणे आहेत. परंतु त्यातील प्रमुख कारण आरोग्याशी संबंधित आहे. घोडीवर बसणे हे नवरदेवाच्या चांगल्या आरोग्याचे प्रतिक आहे. तसेच घोडीची लगान सांभाळण्याचा अर्थ नवरा मुलगा परिवाराची दौर सांभाळण्यास समर्थ झाला आहे.

घोडीवर बसणे म्हणजे वरासाठी एक प्रकारची परीक्षा असते. खरे तर घोडी स्वभावाने खूपच चंचल असते. या परिस्थितीत जर मुलगा यशस्वीपणे घोडीवर आरूढ झाला तर तो आपल्या पत्नीच्या चंचल मनाला प्रेमाने आणि संयमाने हाताळू शकतो असे मानले जाते. तसेच घोडी चढला म्हणजे तो आपल्या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळेल, असेही म्हटले जाते.

घोडा ऐवजी घोडीच का?

घोडा ऐवजी घोडीच का वापरली जाते? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. घोड्यावर का बसवले जात नाही. त्याच्यामागे तर्क असा मांडला जातो की, घोडा स्वभावाने आक्रमक असतो. त्याला प्रशिक्षण दिल्यावर तो नियंत्रणात राहू शकतो. यामुळे घोड्यावर बसणे प्रत्येकाच्या नियंत्रणातील बाब नाही. तसेच बँडच्या आवाजाने घोडा घाबरु शकतो. घोडा उधळला तर ते धोकादायक ठरु शकते. घोडीचा स्वभाव शांत असतो. त्यामुळे घोड्याऐवजी घोडी वापरली जाते.

जुन्या काळात लग्नाच्या प्रसंगी वरला आपली शौर्य दाखवावे लागत होते. त्यामुळे युद्धात घोड्यावर ते जात होते. इतिहासात पहिले तर असे दिसते की, नवरदेवाला लग्नासाठी युद्धही करावे लागले आहे. त्यामुळे घोड्यास शौर्याचे प्रतिक मानले जावू लागले. त्यानंतर काळानुसार घोड्याच्या ठिकाणी घोडीचा वापर होऊ लागला.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.