AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नात नवरदेव घोड्याऐवजी घोडीवर का बसतो? काय आहे त्याच्या मागील कारण

घोडा ऐवजी घोडीच का वापरली जाते? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. घोड्यावर का बसवले जात नाही. त्याच्यामागे तर्क असा मांडला जातो की, घोडा स्वभावाने आक्रमक असतो. त्याला प्रशिक्षण दिल्यावर तो नियंत्रणात राहू शकतो.

लग्नात नवरदेव घोड्याऐवजी घोडीवर का बसतो? काय आहे त्याच्या मागील कारण
नवरदेवाची वरात.Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Mar 06, 2025 | 6:03 PM
Share

लग्न हा भारतीय परंपरेत पवित्र संस्कार आहे. पती अन् पत्नीचे सात जन्माचे बंधनही लग्नास म्हटले जाते. हिंदू धर्मात लग्नाच्या अनेक प्रथा आहेत. लग्नादरम्यान अनेक प्रकारचे विधी केले जातात. त्यापैकी एक म्हणजे घोडीवर बसून लग्नाची मिरवणूक काढली जाते. वर नेहमी घोडीवर स्वार होऊनच वधुला घेण्यासाठी जातो. पण तुम्हाला त्यामागचे कारण माहीत आहे का.

नवरा मुलगा घोडा ऐवजी घोडीवर बसण्याची अनेक कारणे आहेत. परंतु त्यातील प्रमुख कारण आरोग्याशी संबंधित आहे. घोडीवर बसणे हे नवरदेवाच्या चांगल्या आरोग्याचे प्रतिक आहे. तसेच घोडीची लगान सांभाळण्याचा अर्थ नवरा मुलगा परिवाराची दौर सांभाळण्यास समर्थ झाला आहे.

घोडीवर बसणे म्हणजे वरासाठी एक प्रकारची परीक्षा असते. खरे तर घोडी स्वभावाने खूपच चंचल असते. या परिस्थितीत जर मुलगा यशस्वीपणे घोडीवर आरूढ झाला तर तो आपल्या पत्नीच्या चंचल मनाला प्रेमाने आणि संयमाने हाताळू शकतो असे मानले जाते. तसेच घोडी चढला म्हणजे तो आपल्या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळेल, असेही म्हटले जाते.

घोडा ऐवजी घोडीच का?

घोडा ऐवजी घोडीच का वापरली जाते? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. घोड्यावर का बसवले जात नाही. त्याच्यामागे तर्क असा मांडला जातो की, घोडा स्वभावाने आक्रमक असतो. त्याला प्रशिक्षण दिल्यावर तो नियंत्रणात राहू शकतो. यामुळे घोड्यावर बसणे प्रत्येकाच्या नियंत्रणातील बाब नाही. तसेच बँडच्या आवाजाने घोडा घाबरु शकतो. घोडा उधळला तर ते धोकादायक ठरु शकते. घोडीचा स्वभाव शांत असतो. त्यामुळे घोड्याऐवजी घोडी वापरली जाते.

जुन्या काळात लग्नाच्या प्रसंगी वरला आपली शौर्य दाखवावे लागत होते. त्यामुळे युद्धात घोड्यावर ते जात होते. इतिहासात पहिले तर असे दिसते की, नवरदेवाला लग्नासाठी युद्धही करावे लागले आहे. त्यामुळे घोड्यास शौर्याचे प्रतिक मानले जावू लागले. त्यानंतर काळानुसार घोड्याच्या ठिकाणी घोडीचा वापर होऊ लागला.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.