AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हळद लावल्यावर नवरदेव-नवरीला घराच्याबाहेर का पडू देत नाही? तुम्हालाही माहीत नसेल

हिंदू लग्नातील हळदीचा विधी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. नवरा-नवरीला हळद लावल्यानंतर घराबाहेर जाऊ नये अशी प्रथा आहे. यामागे अंधश्रद्धा नाही तर शास्त्रीय कारणे आहेत. तथापि, या प्रथेला वैज्ञानिक पुरावे नाहीत. या लेखात आपण हळदीच्या विधीच्या महत्त्व आणि त्यामागील कारणांचा सखोल अभ्यास करूया.

हळद लावल्यावर नवरदेव-नवरीला घराच्याबाहेर का पडू देत नाही? तुम्हालाही माहीत नसेल
Haldi Ceremony Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Dec 17, 2024 | 3:24 PM
Share

हिंदू धर्मात अनेक रितीरिवाज आहेत. प्रत्येक रितीरिवाजामागे काही तरी धार्मिक कारण असतं. त्यांची एक खासियत असते. लग्नातही अनेक रितीरिवाज असतात. अनेक प्रथा परंपरा असातत. त्यातील एक प्रथा म्हणजे हळद लावणं. हिंदू धर्मात लग्नात हळदीच्या कार्यक्रमाला प्रचंड महत्त्व असतं. नवरदेव नवरीला हळद लावली जाते. या कार्यक्रमाची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत असतात. प्रथेनुसार लग्नात हळद लावली जाते. नवरदेव आणि नवरी दोघांनाही हळद लावली जाते. त्याचीही एक मजेशीर गोष्ट आहे.

हळद लावल्यानंतर नवरदेव आणि नवरीने घराबाहेर पडू नये अशी एक मान्यता आहे. नवरदेव आणि नवरीने हळद लावल्यानंतर घराबाहेर का पडू नये? याचं कारण माहीत आहे का? काय आहे त्याचं महत्त्व? याचीच माहिती आज आपण घेणार आहोत. हळद लागल्यानंतर नवरा-नवरीने बाहेर जाऊ नये ही केवळ अंधश्रद्धा असल्याचं असंख्य लोकांचं म्हणणं आहे. मात्र, त्यामागे इतरही काही कारणं आहेत. हळदीमध्ये एक विशेष प्रकारची गंध असते. ही गंध आजूबाजूची सर्व नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे खेचून घेत असते.

सकारात्मक-नकारात्मक प्रभाव

त्यामुळे ज्याच्या अंगाला हळद लागलेली आहे. त्याच्यावर त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडतो. व्यक्ती मानसिकरित्या सशक्त असेल तर त्याच्या शरीरात दिव्य ऊर्जा जागृत होते. नाही तर नकारात्मक गोष्टीमुळे व्यक्ती कमकुवत होतो, अशी मान्यता आहे. पण या मान्यतेला काहीच शास्त्रीय आधार नाही.

त्वचा काळी पडते

नकारात्मक गोष्टींचा प्रभाव पडल्यानंतर व्यक्ती मानसिक आणि शारीरिकरित्या त्रस्त होतो. असं झाल्यावर शुभ कामात व्यवधान येत असतं. त्यासाठी राहूचा दुष्पप्रभावही विवाहात पाहायला मिळतो, अशी मान्यता आहे. पण या गोष्टीलाही कोणता आधार नाही. मात्र, नवरा-नवरीने हळद लावल्यावर घराबाहेर पडू नये यामागे काही शास्त्रीय कारणंही आहेत. ते म्हणजे, हळद लावल्यानंतर घराच्या बाहेर पडल्यास उन्हामुळे त्वचा काळी पडते. त्यामुळे त्वचा उजळत नाही. त्यामुळेच लग्नाची हळद लावल्यानंतर नवरा-नवरीने घराबाहेर पडू नये, असं सांगितलं जातं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....