AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Environment Day : आंब्याची कोय फेकून देण्याआधी ही बातमी एकदा वाचा

World Environment Day : झाडे लावणे म्हणजे फक्त बिया/बीज घेतले आणि लगेच जमिनीत रुजवून झाडे लावली असा होत नाही, तर जी झाडे किंवा बिया ज्या ठिकाणी रुजवणार आहोत त्या ठिकाणी तेथील परिसर, वातावरण, निसर्ग कसा आहे हे पाहणे महत्वाचे ठरते आणी यालाच bio-diversity (जैव-विविधता) असे म्हणतात. आपण जेथे झाडे लावणार आहोत, तेथील जमीन, मातीची गुणवत्ता, तेथील ऋतू चक्र, तो भाग मूळ जंगलात येतो की शहरी भागात, त्या ठिकाणी कोणते प्राणी-पक्ष्याचा निवास आहे, त्यांच्या जाती काय आहेत, जमिनीत पाण्याचे व हवेत आद्रतेचे काय प्रमाण आहे, ती जमीन सुपीक, नापिक, सदाहरित, वाळवंटी, की बर्फाळ आहे या साऱ्यांचा विचार झाडे लावण्याआधी झाला पाहिजे तरच जैव-विविधता टिकून राहणार आहे.

World Environment Day : आंब्याची कोय फेकून देण्याआधी ही बातमी एकदा वाचा
Mango
| Updated on: Jun 05, 2025 | 1:45 PM
Share

आज जागतिक पर्यावरण दिवस आहे. मानवी अस्तित्व भविष्यात टिकवून ठेवण्यासाठी आज आपण पर्यावरणाची काळजी घेणं काळाची गरज आहे. सध्या ग्लोबल वॉर्मिंगच मानवासमोर आव्हान आहे. या ग्लोबल वॉर्मिंगचे वातावरणावर परिणाम दिसू लागले आहेत. यामुळे पर्यावरणाच संतुलन ढासळत चाललं आहे. पृथ्वीच तापमान वाढतय. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीन प्रमुख ऋतुंमध्ये अनेक बदल दिसून येत आहे. याच ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटावर मात करायची असेल, तर प्रत्येकाने पर्यावरणाची काळजी घेणं हाच मार्ग आहे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला सागर गोपीनाथ बोराटे हा युवक याच प्रेरणेतून पर्यावरणासाठी काम करत आहे. ‘मिशन ग्रीन मुंबई’ संस्थेच्या माध्यमातून त्याचं कार्य सुरु आहे.

आपण प्रकल्प किंवा विकासाच्या नावाखाली जी 200-500 वर्ष जुनी झाडे तोडतो, ती पुनः कधीच आपल्याला मिळणार नाहीत. एक झाड उगवायला प्रौढ अवस्था प्राप्त होण्यास पाच ते दहा वर्षे जातात. पण तीच कापायला एक तास पुरेसा असतो. आता ‘मिशन ग्रीन मुंबई’ संस्थेच्या माध्यमातून आंब्याच्या कोया (बाटे/बिया) जमा करण्याच काम सुरु आहे. “लोकांकडून या आंब्यांच्या बिया घेतल्यानंतर त्या बियांची लहान, लहान कुंड्यांमध्ये लागवड करतो. या बियांपासून मोठे रोप तयार होण्याची ही संपूर्ण प्रोसेस एक वर्षांची असते. आपल्याला लोकांकडून प्राप्त होणाऱ्या या बियांची योग्यरित्या लागवड करतो. पण झाडावर अथवा बियांवर झालेल्या जेनेटिक इंजीनियरिंग मुळे किंवा रोपांमध्ये असलेल्या कुचकामी रोगप्रतिकारक शक्तीमुळे काही बिया उगवण्या आधीच मरतात” असं सागर बोराटेने सांगितलं.

हा एक सामाजिक उपक्रम

आंब्याच्या बरोबरीने फणस, चिंच, जांभूळ यांच्या बिया सुद्धा गोळा केल्या जात आहेत. हा एक सामाजिक उपक्रम आहे. या बिया यावर्षीच्या पावसाळ्यात ओल्या मातीत खोल रुजतील आणि मोठे वटवृक्ष निर्माण करतील. याच वटवृक्ष्याचा गंध भविष्यातही अनेक पिढ्यान सुगंध देत राहतील.

Follow Us
पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
Supriya Sule on Mahesh Landge :पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजार...
Devendra Fadnavis : CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजारांहून अधिक तरुणांची उपस्थिती
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! गणेशोत्सवासाठी कोकण...
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोफत बससेवा
राष्ट्रवादीचा अखेरचा पत्ता उलगडणार? कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक
राष्ट्रावादी अखेरचा पत्ता उलगडणार? एकाच आठवड्यात सलग बैठका, विलिनिकरणाबाबत....
आयकर विभागाची मोठी कारवाई! 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
आयकर विभागाची मोठी कारवाई! तब्बल 2143 कोटी... 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! पुण्यातील सुप्रिसिद्ध...
तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! बऱ्याच काळापासूनची पुण्यातील प्रसिद्ध खाऊगल्ली बंद?
'सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार' गोरेंचं विधान
सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार- जयकुमार गोरे
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला...
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला; बदाम, पिस्त्याच्या दरात ३०० रुपयांपर्यंत वाढ
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात 130 गावांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात 130 गावांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा