AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यशोमती ठाकूर यांच्यावरील ‘ते’ आरोप भोवले. नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात?

राणा दाम्पत्य आणि यशोमती ठाकूर यांच्यातील शाब्दिक चकमकीनंतर अमरावतीमधील वातावरण शांत होईल असे वाटत होते. मात्र, कॉंग्रेसने आता नवनीत राणा यांची खासदारकीच धोक्यात आणणारा निर्णय घेतला आहे.

यशोमती ठाकूर यांच्यावरील 'ते' आरोप भोवले. नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात?
RAVI RANA, NAVNEET RANA VS YASHOMATI THAKURImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Sep 18, 2023 | 7:23 PM
Share

अमरावती : 18 सप्टेंबर 2023 | अमरावती जिल्ह्यामध्ये खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दाम्पत्य एकीकडे आणि दुसऱ्या बाजूला कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर, आमदार बच्चू कडू, आमदार बळवंत वानखडे असा संघर्ष सुरु झाला आहे. दहीहंडी निमित आयोजित कार्यक्रमात बोलताना खासदार नवनीत राणा यांनी माजी मंत्री आणि कॉंगेस आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केला होता. यशोमती ठाकूर यांनी निवडणूक काळात आपल्याकडून कोऱ्या नोटा घेतल्या, पण प्रचार केला नाही असा आरोप केला होता. त्यावरून अमरावती जिल्ह्यातील राजकारण पेटले आहे.

आमदार रवी राणा यांनी दर्यापूरचे काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांच्यावरही जहरी टीका केली होती. दर्यापूरचे आमदार तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या चपला उचलतात अशी टीका त्यांनी केली होती. त्याला उत्तर देताना आमदार बळवंत वानखडे यांनी ‘जात प्रमाणपत्रासाठी राणा केंद्राचे तळवे चाटतात’ असे म्हणत पलटवार केला होता.

‘तू चोट्टा, बायको चोट्टी’, फडतूसपणा करतो

यशोमती ठाकूर यांच्यावर आरोप करताना आमदार रवी राणा यांनी ‘विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्या लिस्टमध्ये यशोमती ठाकूर यांचे नाव होते. पण, मंत्रीपद मिळत नाही म्हणून त्या आल्या नाहीत.’ असा आरोप केला होता. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या या आरोपानंतर कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर चांगल्याच भडकल्या होत्या. औकातीत रहावे, ‘तू चोट्टा, बायको चोट्टी’, फडतूसपणा करतो. काहीही बोलतो. तुम्हाला वहिनी म्हणतो. म्हणून मागच्यावेळी दर दर फिरलो होतो. पण, त्याचे प्रमाणपत्र खोटे निघाले, त्याच चोर आहेत’ असे प्रत्युत्तर दिले होते.

राणा दाम्पत्य आणि यशोमती ठाकूर यांच्यातील शाब्दिक चकमकीनंतर अमरावतीमधील वातावरण शांत होईल असे वाटत होते. मात्र, कॉंग्रेसने आता नवनीत राणा यांची खासदारकीच धोक्यात आणणारा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने खासदार नवनीत राणा यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

खासदारकी रद्द करा

अमरावती जिल्हाधिकारी यांच्यामार्फत काँग्रेसच्या अनुसूचित जातीचे जिल्हाध्यक्ष यांनी ही तक्रार दाखल केली आहे. खासदार नवनीत राणा यांनी तिवसा येथील दहीहंडी कार्यक्रमात काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर 2019 लोकसभा निवडणुकीत कोऱ्या कडक नोटा घेतल्याचा आरोप केला. खासदार नवनीत राणा यांनी या कोऱ्या नोटा कुठून आणल्या असा प्रश्न करत त्यांनी केलेल्या आरोपाची निवडणूक आयोगाने सखोल चौकशी करावी. तसेच, खासदार नवनीत राणा यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.