
NCP Merger : राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी गटाच्या विलीनीकरणाची चर्चा चालू झाली आहे. खासदार शरद पवार यांनी 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार होते. तारीख ठरली होती, असे सांगितले आहे. शरद पवार यांच्या पक्षाच्या सर्वच नेत्यांनी हा दावा खरा असल्याचे सांगितले. तर अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी मात्र हा दावा खोडून काढला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील एकत्रीकरणाची चर्चा चालू असती, तारीख निश्चित झाली असती तर त्याबाबत अजितदादांनी आम्हाला सांगितले असते असे सांगत शरद वार यांच्या मताशी असहमती दर्शवली. असे असतानाच आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. राष्ट्रादीचे दोन्ही एकत्र आल्यानंतर अधिकारांचं वाटप आणि एकत्र झालेली राष्ट्रवादी नेमकी कसी असेल याबाबतची इनसाईड स्टोरी आता समोर आली आहे.
सूत्राच्या माहितीनुसार अजित पवार यांचा पक्ष आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबतची सर्व तयारी झाली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 12 फेब्रुवारी रोजी विलीनीकरणाची घोषणा झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद दिलं जाणार होतं. त्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार होती. अजितदादा यांना राज्यातील सर्व अधिकार दिले जाणार होते. तर आमदार जयंत पाटील यांना मंत्रिपद, रोहित पवार यांना राज्यात राज्यमंत्रिपद दिलं जाणार होतं. विशेष म्हणजे शरद पवार हेच पक्षाच्या सर्वोच्च स्थानी असणार होते.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार होते असे म्हटले जात आहे. तसेच जयंत पाटील आणि रोहित पवार यांनादेखील मंत्रिपद दिले जाणार होते असे सांगितले जात असेल तर शरद पवार यांचा पक्ष एनडीएत सहभागी होणार होता का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळेच आता शरद पवार यावर नेमके काय स्पष्टीकरण देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.