AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार कारने जाण्याऐवजी विमानाने का गेले? आदल्या रात्री काय घडलं? ड्राइव्हरने सर्वच सांगितलं

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनापूर्वीच्या रात्री नक्की काय घडले? त्यांचे खाजगी चालक श्यामराव मनवे यांनी प्रवासाचा प्लॅन कसा बदलला आणि दादांसोबतच्या भावूक आठवणींना कसा उजाळा दिला, वाचा सविस्तर.

अजित पवार कारने जाण्याऐवजी विमानाने का गेले? आदल्या रात्री काय घडलं? ड्राइव्हरने सर्वच सांगितलं
ajit pawar
| Updated on: Feb 03, 2026 | 9:12 AM
Share

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात अकाली निधन झाले. अजित पवारांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित दादांच्या निधनानंतर त्यांच्या जवळचे अनेक व्यक्ती त्यांच्या आठवणी सांगताना दिसत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून अजित दादांसोबत सावलीसारखे सोबत असणारे त्यांचे खाजगी चालक श्यामराव मनवे यांनी त्यांच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. श्यामराव मनवे यांनी अजित दादांच्या निधनच्या आदल्या रात्री काय घडलं होतं, याबद्दलची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी अत्यंत भावूक आठवणींना उजाळा दिला आहे.

अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि खासगी ड्रायव्हर श्यामराव मनवे यांनी त्या शेवटच्या रात्री नेमके काय घडले आणि प्रवासाचे नियोजन कसे बदलले, याचा खुलासा केला आहे. श्यामराव मनवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही त्या रात्री बारामतीला येण्यासाठी सर्व तयारी केली होती. मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक संपवून दादा रस्तेमार्गे पुण्यात मुक्काम करणार होते. त्यानंतर सकाळी १० वाजता बारामतीमधील बैठकांना उपस्थित राहणार होते.

तू उद्या गाडी घेऊन पुण्याला ये…

“दादांची काळजी घेणाऱ्या शंकरने सर्व बॅगा आधीच गाडीत लोड केल्या होत्या. आम्ही प्रवासासाठी रस्ते मार्गाने बारामतीकडे येणार होतो. हा प्रवास निश्चित होता. मात्र, मंत्रिमंडळाची बैठक अपेक्षेपेक्षा जास्त लांबली. रात्री उशीर झाल्यामुळे दादा थकले होते. प्रवासातील थकवा टाळण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणी अजित दादांनी बारामतीला रस्तेमार्गाने जाणं रद्द केले. तू उद्या गाडी घेऊन पुण्याला ये. मी उद्या सकाळी विमानाने थेट बारामतीला जाईन आणि तिथून पुण्याला येईन”, असे अजित दादांनी श्यामराव मनवे यांना सांगितले.

श्यामराव मनवे हे २००९ पासून दादांसोबत आहेत. २०१३ मध्ये सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यावरही त्यांनी दादांची साथ सोडली नाही. यावेळी त्यांनी अजित दादांचा स्वभाव कसा होता, याबद्दलही सांगितले. लोकांना वाटायचे की दादा खूप कडक आहेत, पण तसे नव्हते. ते केवळ शिस्तीचे चाहते होते. जर त्यांनी सकाळी ६ ची वेळ दिली, तर आम्ही ५:३० ला हजर असायचो. विनाकारण ते कधीच कुणावर ओरडले नाहीत. त्यांना स्वच्छतेची आवड होती. माध्यमांचे प्रतिनिधी जेव्हा कव्हरेजसाठी बंगल्यावर येत, तेव्हा त्यांच्या चहा-पाण्याची विचारपूस खुद्द अजित पवार करायचे, असे श्यामराव मनवे म्हणाले.

दादा आपल्यातच आहेत…

मला जे दुःख होत आहे ते मी शब्दांत मांडू शकत नाही. माझे मन अजूनही हेच सांगतेय की दादा आपल्यातच आहेत, ते कुठेही गेलेले नाहीत, अशा शब्दांत श्यामराव मनवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एका नेत्याचा आणि त्याच्या विश्वासू चालकाचा हा प्रवास अशा प्रकारे संपेल, याची कल्पनाही कोणाला नव्हती.

Follow Us
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिय
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; थेट अमित शाह...
निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात!
Omraje Nimbalkar | निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात! अनिल देसाईंच्या त्या विधानाने महाराष्ट्रात खळबळ
ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील मातोश्रीवर, राजकारणात मोठं घडणार?
Omraje Nimbalkar | ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील अचानक 'मातोश्री'वर, राजकारणात मोठं घडणार?
मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
Omraje Nimbakakar | मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
दुर्दैव! हायकोर्टात जाणार... निंबाळकर निकालावर ओमराजेंची प्रतिक्रिया
दुर्दैव! हायकोर्टात जाणार...पवनराजे निंबाळकर निकालावर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! आरोपींची निर्दोष मुक्तता, मात्र खोट्या साक्षीदारामुळे खटला
मोठी बातमी! आरोपींची निर्दोष मुक्तता, मात्र खोट्या साक्षीदारामुळे खटला... पवनराजे निंबाळकर प्रकरणात कायदेतज्ज्ञ काय म्हणाले?
20 वर्षांनंतरचा निकाल! माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही; सर्व आरोपी..
मोठी बातमी! 20 वर्षांनंतरचा निकाल! माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही; पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपी निर्दोष
1 रुपया देतात, 100 रुपये काढतात, ठाकरेंकडून लाडकी बहीण योजनेची पोलखोल
Raj Thackeray | 1 रुपया देतात, 100 रुपये काढतात, राज ठाकरेंकडून लाडकी बहीण योजनेची पोलखोल; सरकारची पिसेच काढली
निकालाचे वाचन; इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमाध्ये... पवनराजे निंबाळकर प्रकरण
Video | निकालाचे वाचन; इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमाध्ये... पवनराजे निंबाळकर प्रकरणात नेमकं काय घडलं?
एकच खळबळ! भाजपमध्ये भयंकर घडतंय... नरेंद्र मोदी आहे तोपर्यंतच शांतता..
एकच खळबळ! भाजपमध्ये भयंकर घडतंय... नरेंद्र मोदी आहे तोपर्यंतच शांतता... राज ठाकरेंचा मोठा दावा