
Rohit Pawar Press Conference On Ajit Pawar Plane Crash : आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अजितदादा यांच्या विमान अपघाताबाबत खळबळ उडवून देणारे दावे केले आहेत. अजितदादा यांचा विमान अपघात हा घात होता, असं थेट भाष्य रोहित पवार यांनी केलं. तसेच त्यांनी अजितदादा ज्या कंपनीच्या विमानातून जात होते, त्या विमान कंपनीचा मालक, पायलट यांच्यावरही शंका उपस्थित केली आहे. सोबतच अजितदादा यांचा 27 जानेवारी रोजीचा कार्यक्रम काय होता? त्यांना उशीर का झाला? अजितदादा यांनी फक्त विमानानेच प्रवास करण्यास भाग पागडले आहे का? असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले आहेत. विशेष म्हणजे अजितदादांसोबत घातपात झाल्याची शंका उपस्थित करताना बडा नेता त्यांना भेटायला आला होता, असाही दावा केला. सोबतच अजितदादांचा हा अपघात नव्हता तर हा नियोजनबद्ध अपघात होता, असे थेट भाष्य करत रोहित पवार यांनी नवे प्रश्न उपस्थित केले आहेत.
रोहित पवार यांनी साधाणा 50 स्लाईडचे एक पीपीटी सादर केले. यावेळी त्यांनी अजितदादा यांच्या विमानाची माहिती दिली. सोबतच त्या विमानात असलेले पायलट, विमानाच प्रवास, बारामतीचे विमानतळ, विमान प्रवासादरम्यानचे हवामान अशा अनेक अंगानी भाष्य केले. तसेच अजितदादांसोबत घातपात झाला होता, अशी शंका उपस्थित करताना त्यांनी काही दावे केले आहेत. ‘अजितदादांसोबत घातपात झाला का? याचा शोध घेतला पाहिजे. अजितदादा हे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्या अपघाताच तपास झाला पाहिजे. 27 जानेवारी रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर चार ते पाच तास मी काम करेन. माझ्या पक्षाचे काही नेते, अधिकारी भेटणार आहेत. मी त्यांच्याशी चर्चा करेन त्यानंतर मी मुंबईला जाईल, असे अजितदादांना सांगितले होते. तसे नियोजन होते,’ असा दावा रोहित पवार यांनी केला.
तसेच एका बड्या नेत्याचा संदर्भ देताना “अजितदादा मुंबईला निघणार होते. त्यासाठी ताफाही लागला होता. परंतु एक फार मोठे नते दादा यांना भेटण्यासाठी वेळेत येणार होते. परंतु ते उशिराने भेटायला आले. उशिराने आल्यामुळे तसेच चर्चा लांबल्यामुळे दादांचा वेळ गेला. अजितदादा पाच-साडे पाच वाजता कारने मुंबईहून पुण्याला निघणार होते. परंतु ते गाडीन जाऊ शकले नाही. त्यांना विमान बुक करावे लागले. नंतर दुसऱ्या दिवशीचे विमान आदल्या दिवशी बुक झाले,’ असा संदर्भ रोहित पवार यांनी दिला. दरम्यान, रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या या शंकांमुळे नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे भविष्यात काय होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.