AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambadas Danve : काही आमदार खरंच गरीब आहेत, त्यांना घर… अंबादास दानवे

Ambadas Danve : "मला असं वाटतं की मी संजय शिरसाट यांना सल्ला मागितला नाही, मी त्यांना प्रश्न देखील केला नाही. मी सरकारला सवाल केला आहे. या प्रश्नाला सरकार उत्तर देईल. स्थापन केलेल्या चौकशी समिती समोर मी पुरावे सादर करणार आहे" असं अंबादास दानवे म्हणाले.

Ambadas Danve : काही आमदार खरंच गरीब आहेत, त्यांना घर... अंबादास दानवे
Ambadas Danve
| Edited By: | Updated on: Dec 18, 2025 | 2:04 PM
Share

“सातारा ड्रग्स प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे. या प्रकरणात जे नाव येत आहे, त्याचे धागेद्वारे उपमुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचत आहे. कारण तिथला रिझल्ट, तिथे काम करणारे लोक या प्रकरणात ज्यांनी या लोकांना काम करायला बोलावलं त्यांना नाही तर, तिथल्या लोकांना अटक करत आहेत. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक यांची ही जबाबदारी होती. मात्र मुंबई पोलिसांनी इथे कारवाई केली आहे, याचा अर्थ सातारा पोलिसांचा यात सपोर्ट होता” असा दावा उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला. “आमदार, खासदारांना मुंबईत घर असावं या हा उद्देश याचा आहे. काही आमदार खरंच गरीब आहेत. सगळेच गरीब आहेत, असं मी म्हणणार नाही. मात्र काही आमदार खरंच गरीब आहेत. त्यांना मिळालं तर यात वावगं असण्याचे कारण नाही” असं अंबादास दानवे म्हणाले.

“आम्हाला अनेक उमेदवारांचे फोन येत आहेत. आम्हाला भाजप, सेनेकडून उमेदवारी मिळाली नाही तर आम्हाला उमेदवारी मिळेल का? अशी विचारणा केली जात आहे. त्या लोकांना आम्ही प्रतिक्रिया दिली नाही, मात्र असे फोन आम्हाला सुरू आहेत एवढेच मी तुम्हाला सांगतो” असं अंबादास दानवे म्हणाले. “वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचाच माणूस आहे. नगरपालिका निवडणुकीत धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराडची आठवण झाली. वाल्मिक कराड सुटला तर हत्तीवरून साखर वाटण्याची तयारी मुंडे यांच्या बगलबच्चानी केली होती. धनंजय मुंडे किंवा वाल्मिक कराड असो वाल्मिक कराडचा या प्रकरणात थेट संबंध आहे. वाल्मिक कराडचा जामीन झाला नाही ते चांगलं झालं” असं अंबादास दानवे म्हणाले.

आपली आघाडी व्हावी असं आमच मत

“अजित दादांच्या राष्ट्रवादी बरोबर पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने जाणं म्हणजे, अजित पवार हे भाजपला मदत करत आहेत. महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो पाहिजे अशी आमची भूमिका आहे. मग काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो आणि आमची शिवसेना अशा पद्धतीने आपली आघाडी व्हावी असं आमच मत आहे” असं अंबादास दानवे म्हणाले. शरद पवार आणि संजय राऊत यांच्या भेटीवर ते म्हणाले की, ‘मी जे बोललो त्याचाच तो भाग असू शकतो सगळ्यांनी मिळून ही निवडणूक लढवली पाहिजे’

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....