AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशांमध्ये वाढ होणार , शिंदेंची मोठी घोषणा, रकमेचा आकडाही आला समोर

लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे, या योजनेंतर्गत सध्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशांमध्ये वाढ होणार , शिंदेंची मोठी घोषणा, रकमेचा आकडाही आला समोर
Ladki Bahin Yojana Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 02, 2026 | 5:50 PM
Share

सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू करण्यात आली होती, या योजनेचा तत्कालीन महायुती सरकारला मोठा फायदा देखील झाल्याचं पहायला मिळालं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं, दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी जर आमची राज्यात सत्ता आली तर आम्ही लाडक्या बहिणींच्या सन्मान निधीमध्ये वाढ करू, 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ, असं अश्वासन त्यावेळी महायुतीच्या काही नेत्यांकडून देण्यात आलं होतं, मात्र आता सरकार सत्तेत येऊन दीड वर्ष होत आलं, तरी देखील लाडक्या बहिणींच्या सन्मन निधीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. आता या योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना मोठी घोषणा केली आहे.

त्यामुळे आता लवकरच लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या सन्मान निधीमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकनाथ शिंदे हे यापूर्वी देखील एक दोनदा यासंदर्भात बोलले होते, लाडक्या बहिणींचा सन्मान निधी आम्ही 1500 रुपयांवरून 2100 रुपये करणार आहोत, असं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान त्यांनी आता पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे, आम्ही लाडक्या बहिणींच्या सन्मान निधीमध्ये वाढ करणार आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता लवकरच लाडक्या बहिणींंना मिळणाऱ्या पैशांमध्ये वाढ होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?  

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही, या योजनेला कोणीही थांबवू शकत नाही. सत्ता येते जाते, पण नाव गेले की परत येत नाही, असे बाळासाहेब ठाकरे सांगायचे. पैसा संपत्तीपेक्षा मी किती तरी माणसांचे प्रेम कमावले आहे, हे मला महत्त्वाचे आहे. मी दिलेला शब्द पाळणारा आणि जगणारा आहे. हे महाराष्ट्रातच्या मनातील सरकार आहे. लाडक्या बहिणींना आम्ही लखपती करणार आहोत.  आम्ही 2100 रुपये देण्याचा शब्द दिला होता, तो पूर्ण करणार आहोत, असं यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय दखील आम्ही योग्यवेळी घेऊ असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!