AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | कळसापासून पायापर्यंत कोरीव काम, जगप्रसिद्ध वेरुळ लेणी, सौंदर्य पाहण्यासाठी डोंगरावर रस्ता बांधणार

कैलास लेणी वरील बाजूने पाहिल्यावर पर्यटकांना ती अद्वितीय व भव्य असल्याची अनुभूती येईल. येत्या वर्षभरात हा रस्ता तयार होईल, असे एएसआय अर्थात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक डॉ. मिलन कुमार चावले यांनी सांगितले.

Aurangabad | कळसापासून पायापर्यंत कोरीव काम, जगप्रसिद्ध वेरुळ लेणी, सौंदर्य पाहण्यासाठी डोंगरावर रस्ता बांधणार
वेरुळ लेणी, औरंगाबाद
| Edited By: | Updated on: Apr 19, 2022 | 6:00 AM
Share

औरंगाबाद : कळसापासून पायापर्यंत अत्यंत सुबक असे कोरीव काम केलेल्या वेरूळ (Ellora Caves) येथील जगप्रसिद्ध लेण्या हा औरंगाबाद नगरीचा मोठा ऐतिहासिक ठेवा आहे. याच ऐतिहासिक लेण्यांचं (Historical caves) सौंदर्य पर्यटकांना अधिक चांगल्या पद्धतीने दाखवण्यासाठी आता डोंगरावर एक रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाकडून (ASI) तयार कऱण्यात आला आहे. कैलास लेणी वरील बाजूने पाहिल्यावर पर्यटकांना ती अद्वितीय व भव्य असल्याची अनुभूती येईल. येत्या वर्षभरात हा रस्ता तयार होईल, असे एएसआय अर्थात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक डॉ. मिलन कुमार चावले यांनी सांगितले. त्यामुळे आगामी वर्षात कैलास लेणींचं सौंदर्य न्याहाळण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी आणखी एक नवी पर्वणी मिळणार आहे.

जगात फक्त अशी तीनच ठिकाणं

कळसापासून पायापर्यंत कोरीव काम करून तयार करण्यात आलेली अशी लेणी जगात फक्त तीनच ठिकाणी आहेत. आफ्रिका, तमिळनाडू आणि वेरूळ अशा तीनच ठीकाण एका दगडातील शिल्पाचे कोरीव काम झाले आहे. त्यापैकी कैलास हे सर्वात मोठे आहे. कळसापासून पायापर्यंत कोरीव शिल्प आहे. डोंगरातून पाहिल्यावर हे स्थळ खरोखरच जागतिक वारसा स्थळ का आहे, ते लक्षात येते. हेच विहंगम दृश्य पर्यटकांना पाहता यावे, यासाठी वरील बाजूने रस्ता तयार करण्याची पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाची योजना आहे. पर्यटकांच्या दृष्टीने हा रस्ता सुरक्षित असेल. सध्या या ठिकाणी एक पाऊलवाट आहे. मात्र ती फारशी सुरक्षित नाही. तिथे रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

येत्या वर्षभरात पूर्ण होणार

भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या महाव्यवस्थापकांनी नुकतीच वेरुळ लेणीची पाहणी केली. हा त्यांचा धावता दौरा होता. यावेळी येथील प्रस्तावित कामांवर चर्चा करण्यात आली. ही कामे पुढील वर्षभरात मार्गी लागतील, असे सांगण्यात आले. त्यात डोंगरावरील रस्त्याचाही प्रस्ताव असल्याची माहिती देण्यात आली आहे.

01 मे रोजी ई-बस

वेरूळ लेणीतील बॅटरीवर चालणाऱ्या बसेस 14 मार्चपासून सुरु होणार होत्या. मात्र, अजूनही या बसच्या तपासणीचे काम सुरु आहे. 01 मेपासून या बस सुरु होण्याची शक्यता आहे. हे सर्व व्हेंडरवर अवलंबून असून लेणी परिसरात चढ-उतार अधिक असल्याने बसची क्षमता तसेच बॅटरीच्या चाचण्या विभागामार्फत केल्या जात आहेत, असे एएसआयचे अधीक्षक डॉ. चावले यांनी सांगितले.

इतर बातम्या

IPL 2022 Covid-19 Case: दिल्लीचा संघ कोरोनाच्या विळख्यात, फिजियोनंतर महत्त्वाचा खेळाडू बाधित, पुण्याला जाणं कॅन्सल

Best Camera Phones: बेस्ट कॅमेरावाले बजेट स्मार्टफोन्स, किंमत 10 हजारांहून कमी

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.