AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतीचं कर्ज फेडायचं कसं? नैराश्यातून तिनं जीवन संपवलं, औरंगाबादेत शेतकरी पत्नीच्या आत्महत्येनं हळहळ

मंदाबाईंनी कर्ज आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज बांधण्यात आला आहे. कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे, शनिवारी 12 मार्च रोजी रात्री घरातील सर्व जण झोपेत असताना, कर्जाला कंटाळून मंदाबाई हिने डाभा शिवारातील गट क्रमांक 54 मधील विहीरीत उडी घेत आपली जीवन यात्रा संपवली.

शेतीचं कर्ज फेडायचं कसं? नैराश्यातून तिनं जीवन संपवलं, औरंगाबादेत शेतकरी पत्नीच्या आत्महत्येनं हळहळ
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Mar 14, 2022 | 12:54 PM
Share

औरंगाबादः वारंवार उद्भवणाऱ्या नापिकीमुळे नैराश्य आल्याने शेतकरी पत्नीने (Farmer Wife Suicide) आयुष्यच संपवल्याची खळबळजनक घटना औरंगाबादेत घडली आहे. जिल्ह्यातील सोयगावातील (Aurangabad Soygaon) डाभा शिवारात ही दुर्दैवी घटना घडली. मंदाबाई मनोबर दांडगे असं शेतकरी पत्नीचं नाव असून शनिवारी रात्रीतून त्या घरातून गायब झाल्या. रविवारी सकाळी कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध सुरु केली असता, शेतातील विहिरीत मंदाबाई यांचा मृतदेह तरंगत (Suicide in Well) असलेला आढळून आला. कुटुंबियांनी सदर घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. फर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

कर्जाच्या टेंशनमुळे सतत चिंतेत

याविषयी सोयगावचे स्थानिक पत्रकार भारत पगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी पत्नी असलेल्या मंदाबाई मनोहर दांडगे यांच्या पतीच्या नावे डाभा शिवारातील गट क्रमांक 5 मध्ये शेती आहे. त्यांच्या पत्नीने ग्रामीण बँक व बुलडाणा येथील बँक यांचे कर्ज घेतलेले होते. शेतात सतत नापिकी होत असल्याने हे कर्ज आपल्या नवऱ्याने कसे फेडावे याबद्धल घरात रोजच किरकिर होत असे. घरातील पाच ते सहा जणांचे जीवन शेतीवर होते. त्यात कोरोना संकटामुळे घरात कोणत्याही प्रकारचा रोजगार नाही, काय करावे समजत नसे. या दररोजचच्या कटकटीतून परमेश्वर तरी बाहेर काढेल व मार्ग निघेल, या विचारात मंदाबाई असायच्या, अशी माहिती कुटुंबियांनी दिली. दरम्यान, मार्च महिना असल्याने बँकेनेही कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तगादा लावला होता. या विषयावर घरात रोजच चर्चा चालायची परंतु उत्तर काहीच मिळत नव्हते. त्यातच घरात लग्नाच्या वयाचा मुलगा असल्याने त्याच्या लग्नाचेही टेंशन होते. अखेर गरीबीमुळे स्वतःला संपवून टाकण्याचे विचार मंदाबाई करायच्या, अशी माहिती कुटुंबियांनी दिली.

सकाळी विहिरीत सापडला मृतदेह

मंदाबाईंनी कर्ज आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज बांधण्यात आला आहे. कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे, शनिवारी 12 मार्च रोजी रात्री घरातील सर्व जण झोपेत असताना, कर्जाला कंटाळून मंदाबाई हिने डाभा शिवारातील गट क्रमांक 54 मधील विहीरीत उडी घेत आपली जीवन यात्रा संपवली. ही घटना सकाळी त्यांच्या मुलास रविवारी सकाळी शोधाशोध केली असता समजली. याप्रकरणी फर्दापूर पोलीस स्टेशन एपीआय अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस पंचनामा केला करण्यात आला. तसेच सावळद बारा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास पीएसआय कासले व पो. हवालदार बागुलकर रवींद्र करीत आहेत.

इतर बातम्या-

‘…म्हणून नाना पटोले हॅलिकॉप्टरने न जाता ट्रेनने गेले

Pune crime| ‘कुठे गेलीये ती मुलगी, हीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका; ट्विटरवर फोटो शेअर करत चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.