औरंगाबादः राज ठाकरेंची (Raj Thackeray) येत्या महाराष्ट्र दिनाला औरंगाबादमध्ये होऊ घातलेली सभा हा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. प्रत्येक राजकीय पक्ष यावर गांभीर्याने भूमिका मांडत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मात्र हा विषय फार गांभीर्यानं घेण्यासारखा नाही, असा पुनरुच्चार केलाय. राज ठाकरेंच्या ठाण्यातील उत्तर सभेनंतरही त्यांनी अशीच प्रतिक्रिया दिली होती, त्यानंतर पुण्यातील सभेत त्यांनी औरंगाबादमधील सभेची (Aurangabad MNS) घोषणा केली. त्यावर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया विचारली असताना, सुप्रिया सुळेंनी या प्रश्नाची खिल्लीच उडवली. तो येईल भाषण करून जाईल, तुम्ही तुमचं काम करा ना.. अशा शब्दात त्यांनी हा विषय टोलवला. सुप्रिया सुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता संवाद कार्यक्रमासाठी औरंगाबादमध्ये आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला सुप्रिया सुळेंनी अशी प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी एका कार्यकर्त्याने राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेबाबत प्रश्न विचारला, त्यावर त्या म्हणाल्या, तो येईल, भाषण देऊन निघून जाईल. तुम्ही तुमचे काम कराना. इतकं महत्त्व देताच तुम्ही कुणाला…..
राज ठाकरे यांचं भाषण म्हणजे निव्वळ मनोरंजन असतं, अशी खोचक टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘थोडा एंटरटेनेमेंटपण होऊ द्या ना… सगळं सिरियस कशाला व्हायला पाहिजे. नेहमीच दूरदर्शन का पहायचं… कधी कधी *** चॅनल पण पहावं ना.. ‘ सुप्रिया सुळेंनी अशी प्रतिक्रिया व्यक्त करताच सभागृहात मोठा हशा पिकला.
Raj Thackeray | तो येईल भाषण करून जाईल… सुप्रिया सुळेंनी असा उडवून दिला प्रश्न….. @Aurangabad pic.twitter.com/gvQpH63frt
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 18, 2022
औरंगाबादमध्ये येत्या 01 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे औरंगाबादमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची सभा ज्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर गाजली होती, त्याच ठिकाणी राज ठाकरेंची ही सभा घेतली जाणार आहे. औरंगाबाद मनसेने यासाठी तयारीही सुरु केली आहे. येत्या 03 मेपर्यंत राज्यातील सर्व मशिदींवरचे भोंगे हटवले पाहिजेत, असा इशारा राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या पुण्यातील सभेत दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबादसारख्या अत्यंत संवेदनशील शहरातील ही सभा महत्त्वाची आहे. कायदा व सुरक्षेच्या दृष्टीने काही प्रश्न उद्धवू शकतात, अशी शंकाही आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष सध्या राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेकडे लागले आहे.
इतर बातम्या-