AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashadhi Ekadashi | आषाढीसाठी मागणीनुसार एसटी मिळणार, 45 प्रवासी जमले की सांगाल तिथे बस! औरंगाबाद आगारात कुणाशी संपर्क साधाल?

राज्य परिवहन मंडळाच्या औरंगाबाद विभागातील नियंत्रकांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 ते 10 जुलै या तारखेदरम्यान, प्रवासी जसे जमतील, तशा पंढरपूरच्या दिशेने बस सोडण्यात येतील .

Ashadhi Ekadashi | आषाढीसाठी मागणीनुसार एसटी मिळणार, 45 प्रवासी जमले की सांगाल तिथे बस! औरंगाबाद आगारात कुणाशी संपर्क साधाल?
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jun 25, 2022 | 2:15 PM
Share

औरंगाबादः राज्यात प्रचंड राजकीय घडामोडी सुरु असताना महाराष्ट्रातील जनतेला पंढरपूरच्या वारीचे (Pandharpur Wari) वेध लागले आहेत. येत्या 10 जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) हजारो भाविक पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जाण्याच्या तयारीत आहेत. त्याकरिता विविध जिल्ह्यांतून राज्य परिवहन मंडळाच्या बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. औरंगाबादेतून पंढरपूरला (Aurangabad-Pandharpur) जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन शहरातील मध्यवर्ती, सिडको आगारसह जिल्ह्यातील 8 आगारांतून 7 ते 10 जुलैदरम्यान 150 ज्यादा बस सोडण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रकानी दिली आहे. तसेच भाविक आणि पर्यटकांची संख्या आणि मागणीनुनसार 24 तास बसेस सोडण्यात येणार आहेत. 40 ते 45 प्रवासी जमले की एक बस सोडण्यात येईल.

मागणीनुसार बस पुरवणार

आषाढी एकादशीनिमित्त विठुमाऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूर वारीला जाण्याची लगबग सुरु झाली आहे. काहींनी वारीत सहभाग घेऊन पंढरपूरकडे प्रस्थानही केले आहे. 10 जुलै रोजीच्या आषाढी एकादशीकरिता निघालेल्या वारीत जे सहभागी नाही होऊ शकले, अशा वारकऱ्यांचीही संख्या मोठी असते. त्यामुळे अशा भाविकांसाठी बसेसची सुविधा केली जाते. राज्य परिवहन मंडळाच्या औरंगाबाद विभागातील नियंत्रकांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 ते 10 जुलै या तारखेदरम्यान, प्रवासी जसे जमतील, तशा पंढरपूरच्या दिशेने बस सोडण्यात येतील . विशेष म्हणजे एखादे गाव, वॉर्डातून भाविकांनी बसची मागणी केली तर त्यांना तेथून बससेवा उपलब्ध करून देण्याची हमी विभाग नियंत्रकांनी घेतील आहे.

बस स्थानकावर सुरक्षा व्यवस्था

एकादशीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांची ऐन एकादशीच्या काळात बस स्थानकावर खूप गर्दी होते. बसमध्ये जागा पकडण्यासाठी जिवााची पर्वा न करता प्रवासी धावपळ करतात. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते. याचा विचार करून सुरक्षा रक्षक तैनात करण्याचे नियोजन परिवहन मंडळातर्फे केले जात आहे.

औरंगाबादेत आठ आगारातील संपर्क क्रमांक असे-

सिडको-

  • 8329881675- ल.वि. लोखंडे
  • 7972153693- स. सु. सूर्यवंशी

मध्यवर्ती-

  • संतोष घाणे- 9420031003-
  • ल. दि. शहा- 7972860922

पैठण-

  • सुहास तरवडे- 9561566421
  • ग.ल. मडके- 9423792007

सिल्लोड-

  • चव्हाण- 8668784158
  • चव्हाण- 7666151317

वैजापूर-

  • हेमंत नेरकर- 9420615287
  • भा. खं. गरूड- 8208360872

कन्नड-

  • भारती- 8668404020
  • काळवणे- 9860982872

गंगापूर-

  • जवळीकर- 9765538484
  • गो. ज. पगारे- 9673542576

सोयगाव-

  • हिलाल ठाकरे- 9665657014
  • बागूल- 9637936474
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.