AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Murder Case | सुखप्रित कौर हत्येच्या तपासासाठी SIT ची स्थापना, न्यायालयात भक्कम पुराव्यानिशी उतरणार!

शनिवारी 21 मे रोजी देवगिरी महाविद्यालयाजवळ भर दिवसा सुखप्रीतसिंगवर एकतर्फी प्रेमातून एकाने चाकूचे 17 वार केले. या घटनेत कशिशचा मृत्यू झाला.

Aurangabad Murder Case |  सुखप्रित कौर हत्येच्या तपासासाठी SIT ची स्थापना, न्यायालयात भक्कम पुराव्यानिशी उतरणार!
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 26, 2022 | 1:54 PM
Share

औरंगाबादः शहरातील एमजीएम महाविद्यालायातील (MGM Collage) विद्यार्थिनीच्या अत्याचार व खून प्रकरणी आरोपीवरील दोष सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यानंतर नुकत्याच घडलेल्या एका खून प्रकरणात संपूर्ण ताकदीनिशी तपास करण्याचं औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad police) ठरवलं आहे. देवगिरी महाविद्यालयातील बीबीएची विद्यार्थिनी सुखप्रीतसिंग कौर (Sukhprit Kaur) ऊर्फ कशिशच्या क्रूर हत्येनंतर आरोपी शरणसिंग सेठी याला गुन्हे शाखेने तत्काळ अटक केली आहे. एकतर्फी प्रेमातून घडलेल्या या घटनेमुळे शहरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आता या प्रकरणात तरी आरोपीवरील गुन्हे सिद्ध करण्यात पोलीस अपयशी होऊ नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याामुळे कशिशचा खटला न्यायालयात भक्कमपणे मांडून आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. या पथकात दोन वरिष्ठ, दोन उपनिरीक्षकांसह दोन कर्मचाऱी असतील. बुधवारी यासंदर्भातली बैठक पोलीस आयुक्तालयात पार पडली.

एकतर्फी प्रेमातून कशिशची हत्या

शनिवारी 21 मे रोजी देवगिरी महाविद्यालयाजवळ भर दिवसा सुखप्रीतसिंगवर एकतर्फी प्रेमातून एकाने चाकूचे 17 वार केले. या घटनेत कशिशचा मृत्यू झाला. दुपारच्या वेळी भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने वेगाने तपास करत या घटनेतील आरोपी शरणसिंग सेठीला 24 तासाच्या आत पकडलं. मात्र आता तपासात भक्कम पुरावे हाती घेण्यासाठी पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली आहे.

नागरिकांचा संताप, दोषीला फाशी देण्याची मागणी

कशिशची अशा प्रकारे निर्घृण हत्या केल्यानंतर देविगिरी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह शेकडो तरुण-तरुणी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी अहिल्याबाई होळकर चौक ते क्रांती चौकापर्यंत कँडल मार्च काढून मारेकऱ्याला फाशी देण्याची मागणी केली . त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. सबळ पुरावे, तपासात त्रुटी राहू नये, तसेच आरोपीला शिक्षा होण्यासाठी न्यायालयात भक्कम बाजू मांडण्यासाठी प्रभावी कागदपत्रे तयार करण्याची जबाबदारी पथकावर सोपवली असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.

मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.