AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Murder Case | सुखप्रित कौर हत्येच्या तपासासाठी SIT ची स्थापना, न्यायालयात भक्कम पुराव्यानिशी उतरणार!

शनिवारी 21 मे रोजी देवगिरी महाविद्यालयाजवळ भर दिवसा सुखप्रीतसिंगवर एकतर्फी प्रेमातून एकाने चाकूचे 17 वार केले. या घटनेत कशिशचा मृत्यू झाला.

Aurangabad Murder Case |  सुखप्रित कौर हत्येच्या तपासासाठी SIT ची स्थापना, न्यायालयात भक्कम पुराव्यानिशी उतरणार!
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 26, 2022 | 1:54 PM
Share

औरंगाबादः शहरातील एमजीएम महाविद्यालायातील (MGM Collage) विद्यार्थिनीच्या अत्याचार व खून प्रकरणी आरोपीवरील दोष सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यानंतर नुकत्याच घडलेल्या एका खून प्रकरणात संपूर्ण ताकदीनिशी तपास करण्याचं औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad police) ठरवलं आहे. देवगिरी महाविद्यालयातील बीबीएची विद्यार्थिनी सुखप्रीतसिंग कौर (Sukhprit Kaur) ऊर्फ कशिशच्या क्रूर हत्येनंतर आरोपी शरणसिंग सेठी याला गुन्हे शाखेने तत्काळ अटक केली आहे. एकतर्फी प्रेमातून घडलेल्या या घटनेमुळे शहरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आता या प्रकरणात तरी आरोपीवरील गुन्हे सिद्ध करण्यात पोलीस अपयशी होऊ नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याामुळे कशिशचा खटला न्यायालयात भक्कमपणे मांडून आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. या पथकात दोन वरिष्ठ, दोन उपनिरीक्षकांसह दोन कर्मचाऱी असतील. बुधवारी यासंदर्भातली बैठक पोलीस आयुक्तालयात पार पडली.

एकतर्फी प्रेमातून कशिशची हत्या

शनिवारी 21 मे रोजी देवगिरी महाविद्यालयाजवळ भर दिवसा सुखप्रीतसिंगवर एकतर्फी प्रेमातून एकाने चाकूचे 17 वार केले. या घटनेत कशिशचा मृत्यू झाला. दुपारच्या वेळी भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने वेगाने तपास करत या घटनेतील आरोपी शरणसिंग सेठीला 24 तासाच्या आत पकडलं. मात्र आता तपासात भक्कम पुरावे हाती घेण्यासाठी पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली आहे.

नागरिकांचा संताप, दोषीला फाशी देण्याची मागणी

कशिशची अशा प्रकारे निर्घृण हत्या केल्यानंतर देविगिरी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह शेकडो तरुण-तरुणी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी अहिल्याबाई होळकर चौक ते क्रांती चौकापर्यंत कँडल मार्च काढून मारेकऱ्याला फाशी देण्याची मागणी केली . त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. सबळ पुरावे, तपासात त्रुटी राहू नये, तसेच आरोपीला शिक्षा होण्यासाठी न्यायालयात भक्कम बाजू मांडण्यासाठी प्रभावी कागदपत्रे तयार करण्याची जबाबदारी पथकावर सोपवली असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.

Follow Us
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार.
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक..
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक...
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले.....
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले......
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?.
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया.
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा...
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा....
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग.
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र...
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र....
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत.
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....