Aurangabad: संभाजीनगर नावाला काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध, दोन्ही शहराध्यक्षांनी स्पष्ट केली भूमिका!

| Updated on: Dec 06, 2021 | 1:30 PM

यंदा महाविकास आघाडी असूनही शिवसेनेचे मंत्री, लोकप्रतिनिझीही संभाजीनगर असा उल्लेख करतात. शहराचे नाव संभाजीनगर झाले पाहिजे, यासाठी ते आग्रहाची भूमिका घेतात. या वादात आता काँग्रेस-राष्ट्रवादीनेही उडी घेतली असून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Aurangabad: संभाजीनगर नावाला काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध, दोन्ही शहराध्यक्षांनी स्पष्ट केली भूमिका!
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर नामकरणाचा मुद्दा पेटला
Follow us on

औरंगाबादः महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे संभाजीनगर (Sambhaji Nagar) नामकरण करण्याच्या मुद्द्याला पुन्हा एकदा हवा दिली जात आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार असताना शिवसेनेचे नेते आणि मंत्री संभाजीनगर या नावावर भर देत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीने शहराचे नाव औरंगाबादच राहील, अशी भूमिका घेतली आहे.

शिवसेनेचा अनेक वर्षांपासूनचा अजेंडा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शहराचे नाव संभाजीनगर ठेवले, तेव्हापासून शिवसेना औरंगाबादचे नाव घेताना संभाजीनगर असाच उल्लेख करते. दरवेळी महापालिका निवडणुकीच्या वेळी हा मुद्दा तापवला जातो. विशेष म्हणजे यंदा महाविकास आघाडी असूनही शिवसेनेचे मंत्री, लोकप्रतिनिझीही संभाजीनगर असा उल्लेख करतात. शहराचे नाव संभाजीनगर झाले पाहिजे, यासाठी ते आग्रहाची भूमिका घेतात. या वादात आता काँग्रेस-राष्ट्रवादीनेही उडी घेतली असून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सर्वसाधारण सभेतील ठरावाने कल्याण काळे अडचणीत

काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत महाविकास आघाडीने शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा ठराव एकमताने मंजूर करून शासनाला पाठवला. या ठरावानंतर औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. या ठरावामुळे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे अडचणीत आले असल्याची चर्चा आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन या वादावर म्हणाले, ”शहराचे नाव कुणीही काहीही घेतल्याने काही फरक पडत नाही. आमच्या नेत्यांनी या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयातही हे प्रकरण प्रलंबित आहे. कुणी कितीही प्रयत्न केले तरी औरंगाबाद हेच नाव राहील.”
तर काँग्रेसचे शहराध्यक्ष  मोहम्मद हिशाम उस्मानी म्हणाले, ”इतिहास बदलण्याचा प्रयत्न कुणीही करून नये, औरंगाबादचे नव्हे तर राज्य व देशातील कोणत्याही शहराचे नाव बदलण्यास काँग्रेसचा विरोध आहे. मित्रपक्ष असो वा कुणीही अशी मागणी केली तरी आम्ही त्याला विरोधच करणार.” शहरातील एका वृत्तपत्राला या दोन्ही नेत्यांनी प्रतिक्रिया दिली.

इतर बातम्या-

Chaityabhoomi | दर्शन रांगेवरुन चैत्यभूमीवर गोंधळ, दोन गटात वाद, काही मिनिटातच परिस्थिती नियंत्रणात

मी केंद्रात कॅबिनेट मंत्री व्हाया देवेंद्र फडणवीस, नारायण राणेंनी मंत्रिपदाचं सिक्रेट सांगताच फडणवीसांनी जोडले हात