AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chaityabhoomi | दर्शन रांगेवरुन चैत्यभूमीवर गोंधळ, दोन गटात वाद, काही मिनिटातच परिस्थिती नियंत्रणात

पोलिसांना सहकार्य करण्याची सर्वांची तयारी होती. मात्र बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सर्वांना आत सोडण्यावरुन वाद निर्माण झाला. यावेळी दोन गट पडले.

Chaityabhoomi | दर्शन रांगेवरुन चैत्यभूमीवर गोंधळ, दोन गटात वाद, काही मिनिटातच परिस्थिती नियंत्रणात
चैत्यभूमीवर काही काळ गोंधळ
Reporter Rahul Zori
Reporter Rahul Zori | Edited By: Anish Bendre | Updated on: Dec 06, 2021 | 1:03 PM
Share

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (6th December Mahaparinirvan Din) महामानवाला अभिवादन करण्यासाठी मुंबईतील दादर भागात असलेल्या चैत्यभूमीवर (Dadar Chaityabhoomi) भीमसागर उसळला आहे. सकाळपासून रांगेत दर्शन झालं, मात्र दुपारच्या वेळेस दर्शनाला सोडण्यावरुन वाद उफाळल्यामुळे दोन गटात गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं.

नेमकं काय घडलं?

नेते आनंदराज आंबेडकर यांचे कार्यकर्ते दुपारच्या सुमारास चैत्यभूमीवर एकवटले होते. पोलिसांना सहकार्य करण्याची सर्वांची तयारी होती. मात्र बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सर्वांना आत सोडण्यावरुन वाद निर्माण झाला. यावेळी दोन गट पडले.

दर्शनाला आत जाताना काही जणांना अडवल्याने गोंधळ निर्माण झाला. फक्त आमच्याच वेळी गाईडलाईन्स का दिल्या जातात, काही जणांनाच प्रवेश का दिला जातो, असा प्रश्न काही कार्यकर्त्यांनी विचारला. काही जणांनी शांततेत दर्शन घेऊ देण्याची मागणी करत जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला.

परिस्थिती नियंत्रणात

त्यानंतर पोलिसांकडून गेट बंद करत अनुयायांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेव्हा पोलीस आणि एका गटात काहीशी झटापट झाली. मात्र काही मिनिटातच तणाव निवळला आणि परिस्थिती पूर्वपदावर आल्याचं चित्र पाहायला मिळालं.

वानखेडेंविरोधात घोषणाबाजी

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सकाळी चैत्यभूमीवर हजेरी लावली असता, त्यांच्या विरोधात चैत्यभूमीवर घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यामुळे समीर वानखेडे यांचे समर्थक आणि विरोधक यांच्यात हमरीतुमरी झाली. वानखेडेंच्या मुद्द्यावरुन समर्थक आणि विरोधक एकमेकांना भिडल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. समीर वानखेडे यांना चैत्यभूमीवर येण्याचा नैतिक अधिकार नाही. असं म्हणत भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष अनिल दगडू कांबळे यांनी विरोध केला होता.

संबंधित बातम्या :

Dr. Ambedkar: महामानवाच्या अस्थी मराठवाड्यात फक्त एकाच ठिकाणी, औरंगाबादच्या भाऊसाहेब मोरे कुटुंबियांकडे लाखमोलाचा वारसा!

बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यपाल चैत्यभूमीवर, अजित पवार, आदित्य ठाकरेंचीही हजेरी, दादा म्हणतात

Sameer Wankhede | चैत्यभूमीवर अभिवादन, वानखेडेंच्या विरोधात घोषणाबाजी; तर प्रकाश आंबेडकरांशीही चर्चा

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली