शिंदे सरकारवर निधीवाटपावरुन आरोप होऊ लागला आहे. ज्या निधीचे कारण सांगून शिवसेनेतून बंड करुन एकनाथ शिंदे यांनी भाजपबरोबर सरकारची स्थापना केली येथेही त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. शिवाय चांगली खाती भाजपाने स्वत:कडे तर ठेवलीच पण आता निधीवाटपातही दुजाभावच केला आहे. मात्र, हे आरोप म्हणजे संभ्रम निर्माण करण्यासाठी आहेत.