AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad: जिल्ह्यात 128 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांची तयारी, 30 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्जाला सुरुवात

कोरोना प्रादुर्भावामुळे औरंगाबादमधील ग्रामपंचायत पोटनिवडणूका लांबणीवर पडल्या होत्या. मात्र आता निवडणूका घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भातील सविस्तर कार्यक्रम जिल्हा प्रशासनाकडे पाठवला आहे.

Aurangabad: जिल्ह्यात 128 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांची तयारी, 30 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्जाला सुरुवात
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Nov 25, 2021 | 6:11 PM
Share

औरंगाबादः जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आली होती. सध्या रुग्णसंख्या कमी असल्याने निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून जिल्ह्यातील 128 ग्रामपंचातयींच्या रिक्त 185 जागांसाठी येत्या 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी सर्व तहसील कार्यालयांमध्ये निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. येत्या 30 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

6 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत

निवडणूक कार्यक्रमानुसार, 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरदरम्यान दररोज सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर 7 डिसेंबरला सकाळी 11 वाजता दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर 9 डिसेंबरच्या दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यास मुदत देण्यात आली आहे. तर त्याच दिवशी दुपारी 3 वाजेनंतर निवडणूक चिन्ह वाटप होणार आहे. तर 22 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीची वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तहसीलदार निश्चित करतील, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

औरंगाबाद तालुक्यात 26 जागा रिक्त

जिल्ह्यातील तालुकानिहाय रिक्त जागा पाहिल्यास औरंगाबादमध्ये वीस ग्रामपंचायतीत 26 जागा रिक्त आहेत. तर पैठणमध्ये 14 ग्रामपंचायतीत 17 जागा रिक्त आहेत. अशा प्रकारे फुलंब्रीत 20, वैजापूरमध्ये 29, गंगापूरमध्ये 20, कन्नडमध्ये 21, खुलताबादमध्ये 19, सिल्लोडमध्ये 21 तर सोयगावात 12 जागांवर पोटनिवडणूका घेण्यात येतील.

इतर बातम्या-

ठरलं! राज्याचं हिवाळी अधिवेशन 22 ते 28 डिसेंबरला मुंबईतच होणार- सूत्र

शेतकऱ्यांनो अन्नदाता तर आहातच पण आता उर्जा दाताही व्हा : मंत्री नितीन गडकरी

Follow Us
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... बापरे! संजय राऊत हे काय बोलून गेले? थेट सोने तस्करीशी कनेक्शन!
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?