AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad: जिल्ह्यात 128 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांची तयारी, 30 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्जाला सुरुवात

कोरोना प्रादुर्भावामुळे औरंगाबादमधील ग्रामपंचायत पोटनिवडणूका लांबणीवर पडल्या होत्या. मात्र आता निवडणूका घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भातील सविस्तर कार्यक्रम जिल्हा प्रशासनाकडे पाठवला आहे.

Aurangabad: जिल्ह्यात 128 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांची तयारी, 30 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्जाला सुरुवात
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 25, 2021 | 6:11 PM
Share

औरंगाबादः जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आली होती. सध्या रुग्णसंख्या कमी असल्याने निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून जिल्ह्यातील 128 ग्रामपंचातयींच्या रिक्त 185 जागांसाठी येत्या 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी सर्व तहसील कार्यालयांमध्ये निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. येत्या 30 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

6 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत

निवडणूक कार्यक्रमानुसार, 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरदरम्यान दररोज सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर 7 डिसेंबरला सकाळी 11 वाजता दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर 9 डिसेंबरच्या दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यास मुदत देण्यात आली आहे. तर त्याच दिवशी दुपारी 3 वाजेनंतर निवडणूक चिन्ह वाटप होणार आहे. तर 22 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीची वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तहसीलदार निश्चित करतील, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

औरंगाबाद तालुक्यात 26 जागा रिक्त

जिल्ह्यातील तालुकानिहाय रिक्त जागा पाहिल्यास औरंगाबादमध्ये वीस ग्रामपंचायतीत 26 जागा रिक्त आहेत. तर पैठणमध्ये 14 ग्रामपंचायतीत 17 जागा रिक्त आहेत. अशा प्रकारे फुलंब्रीत 20, वैजापूरमध्ये 29, गंगापूरमध्ये 20, कन्नडमध्ये 21, खुलताबादमध्ये 19, सिल्लोडमध्ये 21 तर सोयगावात 12 जागांवर पोटनिवडणूका घेण्यात येतील.

इतर बातम्या-

ठरलं! राज्याचं हिवाळी अधिवेशन 22 ते 28 डिसेंबरला मुंबईतच होणार- सूत्र

शेतकऱ्यांनो अन्नदाता तर आहातच पण आता उर्जा दाताही व्हा : मंत्री नितीन गडकरी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.