AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad: जिल्ह्यात 128 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांची तयारी, 30 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्जाला सुरुवात

कोरोना प्रादुर्भावामुळे औरंगाबादमधील ग्रामपंचायत पोटनिवडणूका लांबणीवर पडल्या होत्या. मात्र आता निवडणूका घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भातील सविस्तर कार्यक्रम जिल्हा प्रशासनाकडे पाठवला आहे.

Aurangabad: जिल्ह्यात 128 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांची तयारी, 30 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्जाला सुरुवात
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 25, 2021 | 6:11 PM
Share

औरंगाबादः जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आली होती. सध्या रुग्णसंख्या कमी असल्याने निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून जिल्ह्यातील 128 ग्रामपंचातयींच्या रिक्त 185 जागांसाठी येत्या 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी सर्व तहसील कार्यालयांमध्ये निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. येत्या 30 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

6 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत

निवडणूक कार्यक्रमानुसार, 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरदरम्यान दररोज सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर 7 डिसेंबरला सकाळी 11 वाजता दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर 9 डिसेंबरच्या दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यास मुदत देण्यात आली आहे. तर त्याच दिवशी दुपारी 3 वाजेनंतर निवडणूक चिन्ह वाटप होणार आहे. तर 22 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीची वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तहसीलदार निश्चित करतील, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

औरंगाबाद तालुक्यात 26 जागा रिक्त

जिल्ह्यातील तालुकानिहाय रिक्त जागा पाहिल्यास औरंगाबादमध्ये वीस ग्रामपंचायतीत 26 जागा रिक्त आहेत. तर पैठणमध्ये 14 ग्रामपंचायतीत 17 जागा रिक्त आहेत. अशा प्रकारे फुलंब्रीत 20, वैजापूरमध्ये 29, गंगापूरमध्ये 20, कन्नडमध्ये 21, खुलताबादमध्ये 19, सिल्लोडमध्ये 21 तर सोयगावात 12 जागांवर पोटनिवडणूका घेण्यात येतील.

इतर बातम्या-

ठरलं! राज्याचं हिवाळी अधिवेशन 22 ते 28 डिसेंबरला मुंबईतच होणार- सूत्र

शेतकऱ्यांनो अन्नदाता तर आहातच पण आता उर्जा दाताही व्हा : मंत्री नितीन गडकरी

Follow Us
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना.
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती.
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.