AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद जिल्ह्यात किती मंत्री?, संदीपान भुमरे यांनी राज्य, केंद्राचा आकडाचं सांगितला

अजून काही वेटिंगवर आहेत, असं म्हणून संदीपान भुमरे यांनी काही राजकीय नेत्यांकडं इशारा केला.

औरंगाबाद जिल्ह्यात किती मंत्री?, संदीपान भुमरे यांनी राज्य, केंद्राचा आकडाचं सांगितला
संदीपान भुमरे यांचा इशारा कोणाकडं?Image Credit source: tv 9
| Updated on: Oct 15, 2022 | 6:56 PM
Share

दत्ता कानवटे, TV9 मराठी, प्रतिनिधी, औरंगाबाद : रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. संदीपान भुमरे म्हणाले, पालकमंत्री म्हणून बँक सुधारावी, अशी आमची इच्छा आहे. अशी संधी कधी येणार नाही. औरंगाबाद जिल्हा नशिबवान आहे. औरंगाबाद जिल्ह्याला दोन केंद्रीय मंत्री, तीन कॅबिनेट मंत्री, एक विरोधी पक्षनेता अशी महत्त्वाची पदं मिळाली आहेत. अजून काही वेटिंगवर आहेत, असं म्हणून संदीपान भुमरे यांनी काही राजकीय नेत्यांकडं इशारा केला.

पण, तो कुणाकडं केला. ते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही. त्यामुळं वेटिंगवर कोण, अशी चर्चा सुरू झाली. वेटिंगवर असलेलेसुद्धा येऊ शकतात, असंही भुमरे म्हणाले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर काही जण विश्वास ठेऊन येणार असल्याचं ते म्हणाले.

औरंगाबाद जिल्ह्याला 22 वर्षांनंतर स्थानिक पालकमंत्री झाला. स्थानिक पालकमंत्री मिळाला त्याचा फायदा बँकेसाठी आणि विकासासाठी करू. अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. त्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील बँकेचा प्रश्न सोडविला. औरंगाबादेतही बँकेचा प्रश्न सोडवू, असं भुमरे म्हणाले.

कांद्याला 25 टनला अनुदान देत होतो. आता 50 टनला अनुदान देण्यात येणार आहे. आधी टनामागे दीड हजार रुपये अनुदान मिळायचं ते आता पाच हजार रुपये केल्याचं संदीपान भुमरे यांनी सांगितलं.

शेतकरी कांदा लागवड करतो. विहिरीला तीन लाख रुपये होते. मी चार लाख रुपयांचं अनुदान केलं. पाचशे फुटाच्या आत विहीर खोदता येत नव्हती. ते अंतर दीडशे फुटावर आणलं. असल्याचं भुमरे यांनी सांगितलं.

फलोत्पादनच्या बाबतीत अंतर काढून टाकलं. सगळे शेतकऱ्यांसाठी काम करू. शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजे. माझं खातंही शेतकरी, मजुराचं खात आहे.

आम्हाला सर्व केंद्राचे नार्म आहेत. केंद्राची मदत लागेल. शेतकऱ्यांसाठी काही योजना आणता येतील. केळी, द्राक्ष, ड्रगन फ्रृट, शेवगा लागवड ही रोजगार हमी योजनेत घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.