PHOTO | औरंगाबादेत शेततळ्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू, शरणापूर शिवारातील धक्कादायक घटना !

शरणापूर शिवारातील तळ्यावर सायकलवर फिरण्यासाठी ही मुले गेली होती. तळ्यावर पोहोचल्यावर ते पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने या तिघांचाही बुडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

PHOTO | औरंगाबादेत शेततळ्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू, शरणापूर शिवारातील धक्कादायक घटना !
| Edited By: | Updated on: Feb 21, 2022 | 4:45 PM

औरंगाबादः जिल्ह्यातील शरणापूर शिवार परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा पाण्यात बुडून (Three children drawn) मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शरणापूर परिसरावर शोककळा पसरली आहे. आज दुपारी अग्निशमन दलाच्या (Fire brigade) जवानांनी या तिघांचेही मृतदेह बाहेर काढले. यावेळी अवघा गाव गोळा झाला होता.

काही वेळापूर्वी पोहण्यासाठी गेलेल्या या मुलांचा एवढ्या दुर्दैवी अंत (Aurangabad mishap ) होईल, अशी कल्पानाही कुणी केली नव्हती. मात्र पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्यामुळे मुलांचा मृत्यू झाला, असावा, असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे.

भांगसी गड पायथ्याशी शेततळे

याविषयी हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शरणापूर शिवारात भांगसी गड पायथ्याशी नारायण वाघमारे यांचे शेततळे आहे. या तळ्यावर सायकलवर फिरण्यासाठी ही मुले गेली होती. तळ्यावर पोहोचल्यावर ते पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने या तिघांचाही बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेत मरण पावलेल्या मुलांची नावं पुढील प्रमाणे-
प्रतिक आनंद भिसे (15)
तिरुपती मारोती इंदलकर (15)
शिवराज संजय पवार (17)

शरणापूर परिसरावर शोककळा

सकाळी शेततळ्यावर फिरण्यासाठी गेलेल्या मुलांचा या पद्धतीने करुण अंत होईल, याची कल्पानाही कुणी केली नसेल.  मात्र शिवारात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अग्निशामक दलाने या मुलांचे मृतदेह बाहेर काढले, त्यानंतर अवघा गाव सुन्न झाला.

इतर बातम्या-

सोशल मीडियावर ‘परश्या’ची हवा; ‘अब कुछ बडा लफडा होगा’ म्हणत पोस्ट केला जबराट लूक

नाशिकमध्ये कोरोनाचा पुन्हा एक बळी; किती आहेत रुग्ण, भीती नेमकी कशाची?