AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद मनपात एकला चलो रे?, प्रकाश आंबेडकरांनी दिलेला पर्याय काय

काँग्रेस, शिवसेनेची भूमिकेवरून सर्व पक्ष वेगवेगळे लढतील, असं वाटतं.

औरंगाबाद मनपात एकला चलो रे?, प्रकाश आंबेडकरांनी दिलेला पर्याय काय
प्रकाश आंबेडकर म्हणतात,... Image Credit source: t v 9
| Updated on: Oct 07, 2022 | 5:56 PM
Share

संजय सरोदे, TV9 मराठी, प्रतिनिधी, जालना : औरंगाबाद महापालिकेत वंचित बहुजन आघाडी वेगळी लढण्याच्या तयारीत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी जालन्यात हे वक्तव्य केलंय. महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीने भूमिका घेतलेली आहे. आम्ही युती केली तर शिवसेना, काँग्रेसबरोबर (Congress) करायला तयार आहोत. परंतु अजूनही काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.

वेगळे लढण्याच्या तयारीला लागले

आमची भूमिका स्पष्ट आहे. पण शिवसेना आणि काँग्रेसची अस्पष्ट भूमिका आहे. सर्व पक्ष वेगवेगळे लढतील. त्यामुळे आम्ही वेगळे लढण्याच्या तयारीला लागलो आहोत, असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेला सोबत घेण्याबाबतचा निर्णय योग्य वेळी घेण्यात येईल, असेही आंबेडकर यांनी सांगितलं.

घटना बदलण्याचा अजेंडा

भाजपा आणि आरएसएस यांचा एकमेव अजेंडा घटना बदलण्याचा आहे. सेनेबरोबर मतभेद असलेले तरी शिवसेना घटना बदला म्हणत नाही. त्याचाच एकभाग काँग्रेस आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना आणि काँग्रेसला युती बाबत हाक दिली. असं वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

सर्व पक्ष वेगवेगळे लढतील

पण, जी माहिती देण्यात आली त्यावरून काँग्रेस, शिवसेनेकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं आमची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेस, शिवसेनेची भूमिकेवरून सर्व पक्ष वेगवेगळे लढतील, असं वाटतं. त्यामुळं आम्हीसुद्धा वेगळे लढण्याच्या तयारीला लागलो असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आम्ही निरोप पाठविला आहे. त्यांनी रिस्पान्स करण्याचा भाग आहे. रिस्पान्स न मिळण्याचे योग्य वेळेस कारण सांगू. महाराष्ट्र समितीत निर्णय घेईल. अजून जादुची कांडी निघाली नाही, की, शंभर दिवसात बदलेलं असं मला कधीचं वाटत नाही.

दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका.
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!.
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार.
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद.
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती.
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष.
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक.
2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! राज ठाकरेंनी दिले आदेश
2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! राज ठाकरेंनी दिले आदेश.