AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद मनपात एकला चलो रे?, प्रकाश आंबेडकरांनी दिलेला पर्याय काय

काँग्रेस, शिवसेनेची भूमिकेवरून सर्व पक्ष वेगवेगळे लढतील, असं वाटतं.

औरंगाबाद मनपात एकला चलो रे?, प्रकाश आंबेडकरांनी दिलेला पर्याय काय
प्रकाश आंबेडकर म्हणतात,... Image Credit source: t v 9
| Updated on: Oct 07, 2022 | 5:56 PM
Share

संजय सरोदे, TV9 मराठी, प्रतिनिधी, जालना : औरंगाबाद महापालिकेत वंचित बहुजन आघाडी वेगळी लढण्याच्या तयारीत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी जालन्यात हे वक्तव्य केलंय. महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीने भूमिका घेतलेली आहे. आम्ही युती केली तर शिवसेना, काँग्रेसबरोबर (Congress) करायला तयार आहोत. परंतु अजूनही काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.

वेगळे लढण्याच्या तयारीला लागले

आमची भूमिका स्पष्ट आहे. पण शिवसेना आणि काँग्रेसची अस्पष्ट भूमिका आहे. सर्व पक्ष वेगवेगळे लढतील. त्यामुळे आम्ही वेगळे लढण्याच्या तयारीला लागलो आहोत, असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेला सोबत घेण्याबाबतचा निर्णय योग्य वेळी घेण्यात येईल, असेही आंबेडकर यांनी सांगितलं.

घटना बदलण्याचा अजेंडा

भाजपा आणि आरएसएस यांचा एकमेव अजेंडा घटना बदलण्याचा आहे. सेनेबरोबर मतभेद असलेले तरी शिवसेना घटना बदला म्हणत नाही. त्याचाच एकभाग काँग्रेस आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना आणि काँग्रेसला युती बाबत हाक दिली. असं वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

सर्व पक्ष वेगवेगळे लढतील

पण, जी माहिती देण्यात आली त्यावरून काँग्रेस, शिवसेनेकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं आमची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेस, शिवसेनेची भूमिकेवरून सर्व पक्ष वेगवेगळे लढतील, असं वाटतं. त्यामुळं आम्हीसुद्धा वेगळे लढण्याच्या तयारीला लागलो असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आम्ही निरोप पाठविला आहे. त्यांनी रिस्पान्स करण्याचा भाग आहे. रिस्पान्स न मिळण्याचे योग्य वेळेस कारण सांगू. महाराष्ट्र समितीत निर्णय घेईल. अजून जादुची कांडी निघाली नाही, की, शंभर दिवसात बदलेलं असं मला कधीचं वाटत नाही.

Follow Us
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....
शिवसेना- भाजपमध्ये तणाव, एकनाथ शिंदे यांची तातडीने मंत्र्यांसोबत बैठक
शिवसेना- भाजपमध्ये तणाव, एकनाथ शिंदे यांची तातडीने मंत्र्यांसोबत बैठक.
सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन करा, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून आदेश
सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन करा, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून आदेश.
मला अडवले, ओढत नेले... शंभुराज देसाई संतापले... विधान परिषदेत....
मला अडवले, ओढत नेले... शंभुराज देसाई संतापले... विधान परिषदेत.....
त्या सॉफ्ट टार्गेट, 9 माजी मंत्र्यांची चौकशी करा; संजय राऊत....
त्या सॉफ्ट टार्गेट, 9 माजी मंत्र्यांची चौकशी करा; संजय राऊत.....
खरातसोबत कुणाकुणाचे संबंध? संजय राऊतांनी थेट नावच घेतली
खरातसोबत कुणाकुणाचे संबंध? संजय राऊतांनी थेट नावच घेतली.
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...