AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मागासवर्ग आयोगाला फक्त आदेश द्या…विशेष अधिवेशन नको…काय म्हणतात मनोज जरांगे

manoj jarange patil maratha reservation issue | न्या. शिंदे समितीकडूनही चांगले काम झाले आहे. मराठा समाज ओबीसी आरक्षणात आहे, हे देखील सिद्ध झाले आहे. यामुळे मागासवर्ग आयोगाचा अहवाल तुम्हाला कशासाठी पाहिजे? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. 24 डिसेंबरनंतर सरकारला वेळ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

मागासवर्ग आयोगाला फक्त आदेश द्या...विशेष अधिवेशन नको...काय म्हणतात मनोज जरांगे
मनोज जरांगे
| Updated on: Dec 19, 2023 | 11:54 AM
Share

संजय सरोदे, जालना, दि.19 डिसेंबर | मराठा आरक्षण राज्य सरकारने 24 डिसेंबरपर्यंतच दिले पाहिजे. या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. आता यासंदर्भात कोणतेही बाकीचे बहाणे आम्हाला चालणार नाही. आतापर्यंत या विषयावर सरकारने काम चांगले केले आहे. न्या. शिंदे समितीकडूनही चांगले काम झाले आहे. मराठा समाज ओबीसी आरक्षणात आहे, हे देखील सिद्ध झाले आहे. यामुळे मागासवर्ग आयोगाचा अहवाल तुम्हाला कशासाठी पाहिजे? मागासवर्ग आयोगाला फक्त आदेश द्यायचे असतात. तसेच मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज नाही. तुम्ही हवे तर अधिवेशन पुढे अजून आठ दिवस वाढवा. 24 डिसेंबरपर्यंत असणारे अधिवेशन 29 डिसेंबरपर्यंत अधिवेशन करा, पण आरक्षणावर निर्णय घ्या, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सांगितले. ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना त्यांनी विविध मुद्यांची मांडणी केली.

आरक्षण घेणारच, आता वेळ मिळणार नाही

24 डिसेंबरच्या पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेळ मागण्याची शक्यता नाही. त्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा पाठबळ आहे. त्यामुळे शंभर टक्के मराठांना 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळणार आहे. आता सर्व पुरावे असताना विनाकारण बहाने सांगू नये. त्या लोकांचे ऐकूण तुम्हाला मराठ्यांवर अन्याय करायचा आहे का? त्यांचे एकूण तुम्ही मराठ्यांच्या पोरांचे वाटूळ करणार असाल तर परिणाम वेगळे होतील, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. त्यांचे ऐकून जर तुम्ही मराठ्यांवर अन्याय केला तर सहा कोटी मराठ्यांची नाराजगी ओढून घ्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आंबेडकर यांचे सोल्यूशन…

मराठा आरक्षणाबाबत प्रकाश आंबेडकर यांच्याकडे तोडगा आहे. त्यांचे हे सोल्यूशन आपण ऐकण्यास तयार आहोत. ऋषिकेश बेंद्रे कधीही नाराज होऊ शकत नाही. त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजासाठी काम केले आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मराठा संवाद यात्रेत 20 ते 23 असा चार दिवस दौरा असणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. बदनापूर सेलू रेनापुर गंगाखेड आणि बीड असा आहे वीसला गेवराईत आहे.

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.