AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मागासवर्ग आयोगाला फक्त आदेश द्या…विशेष अधिवेशन नको…काय म्हणतात मनोज जरांगे

manoj jarange patil maratha reservation issue | न्या. शिंदे समितीकडूनही चांगले काम झाले आहे. मराठा समाज ओबीसी आरक्षणात आहे, हे देखील सिद्ध झाले आहे. यामुळे मागासवर्ग आयोगाचा अहवाल तुम्हाला कशासाठी पाहिजे? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. 24 डिसेंबरनंतर सरकारला वेळ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

मागासवर्ग आयोगाला फक्त आदेश द्या...विशेष अधिवेशन नको...काय म्हणतात मनोज जरांगे
मनोज जरांगे
| Updated on: Dec 19, 2023 | 11:54 AM
Share

संजय सरोदे, जालना, दि.19 डिसेंबर | मराठा आरक्षण राज्य सरकारने 24 डिसेंबरपर्यंतच दिले पाहिजे. या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. आता यासंदर्भात कोणतेही बाकीचे बहाणे आम्हाला चालणार नाही. आतापर्यंत या विषयावर सरकारने काम चांगले केले आहे. न्या. शिंदे समितीकडूनही चांगले काम झाले आहे. मराठा समाज ओबीसी आरक्षणात आहे, हे देखील सिद्ध झाले आहे. यामुळे मागासवर्ग आयोगाचा अहवाल तुम्हाला कशासाठी पाहिजे? मागासवर्ग आयोगाला फक्त आदेश द्यायचे असतात. तसेच मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज नाही. तुम्ही हवे तर अधिवेशन पुढे अजून आठ दिवस वाढवा. 24 डिसेंबरपर्यंत असणारे अधिवेशन 29 डिसेंबरपर्यंत अधिवेशन करा, पण आरक्षणावर निर्णय घ्या, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सांगितले. ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना त्यांनी विविध मुद्यांची मांडणी केली.

आरक्षण घेणारच, आता वेळ मिळणार नाही

24 डिसेंबरच्या पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेळ मागण्याची शक्यता नाही. त्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा पाठबळ आहे. त्यामुळे शंभर टक्के मराठांना 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळणार आहे. आता सर्व पुरावे असताना विनाकारण बहाने सांगू नये. त्या लोकांचे ऐकूण तुम्हाला मराठ्यांवर अन्याय करायचा आहे का? त्यांचे एकूण तुम्ही मराठ्यांच्या पोरांचे वाटूळ करणार असाल तर परिणाम वेगळे होतील, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. त्यांचे ऐकून जर तुम्ही मराठ्यांवर अन्याय केला तर सहा कोटी मराठ्यांची नाराजगी ओढून घ्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आंबेडकर यांचे सोल्यूशन…

मराठा आरक्षणाबाबत प्रकाश आंबेडकर यांच्याकडे तोडगा आहे. त्यांचे हे सोल्यूशन आपण ऐकण्यास तयार आहोत. ऋषिकेश बेंद्रे कधीही नाराज होऊ शकत नाही. त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजासाठी काम केले आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मराठा संवाद यात्रेत 20 ते 23 असा चार दिवस दौरा असणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. बदनापूर सेलू रेनापुर गंगाखेड आणि बीड असा आहे वीसला गेवराईत आहे.

Follow Us
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा.
चंद्रकांत खैरे यांचा अघोरी पूजेबाबत धक्कादायक दावा, राजकीय वर्तुळात...
चंद्रकांत खैरे यांचा अघोरी पूजेबाबत धक्कादायक दावा, राजकीय वर्तुळात....
आपल्या वयाच्या आधीच दातांचं वय वाढतं? कसं? तुमचं डेंटल एज
आपल्या वयाच्या आधीच दातांचं वय वाढतं? कसं? तुमचं डेंटल एज.
दातांचे वय वाढण्यापूर्वी व्हा सावध; आजच तुमचं डेंटल एज तपासा
दातांचे वय वाढण्यापूर्वी व्हा सावध; आजच तुमचं डेंटल एज तपासा.
इराण-इस्त्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय
इराण-इस्त्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय.
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय.
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर...
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर....
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?.
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव.
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?.