AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारने शिंदे समितीचा दुसरा अहवाल स्वीकारला, मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया काय?

आरक्षण देताना तुम्ही भेद करू शकत नाहीत. कारण, ज्याची नोंद सापडली त्याला देणार आणि त्याच्या सख्या भावाला नाही देणार असा भेद तुम्ही करू शकत नाही. ज्याची नोंद मिळाली त्याच्या पुढच्या परिवाराला त्या नोंदीचा लाभ घेता आला पाहिजे.

सरकारने शिंदे समितीचा दुसरा अहवाल स्वीकारला, मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया काय?
CM EKNATH SHINDE AND MANOJ JARANGE PATIL Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Dec 18, 2023 | 10:47 PM
Share

जालना | 18 डिसेंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने नेमलेल्या शिंदे समितीने दुसरा अहवाल सरकारला सादर केला. हा अहवाल मंगळवारी सभागृहात सादर केला जाणार आहे. सरकारच्या या निर्णयावर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सरकारने प्रथम अहवाल स्वीकारला आणि आता दुसरा अहवाल स्वीकारला आहे. उपोषण ठरताना हेच ठरले होते की, ज्या नोंदी मिळाल्या आहेत त्याआधारे महाराष्ट्रामधील मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कायदा पारित करू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

शिंदे समितीला ज्या नोंदी मिळाल्या आहेत त्या आणखी शोधण्यात आल्या पाहिजेत. सरकारने जरी अहवाल स्वीकारला असला तरी या समितीने पुढेही काम सुरू ठेवले पाहिजे ही सरकारला विनंती असेही जरांगे पाटील म्हणाले. खूप ठिकाणी नोंदी नाहीत म्हणून सांगण्यात आले. या ज्या नोंदी मिळाल्या आहेत त्याचा लाभ त्याच्या सर्व कुटुंबाला मिळाला पाहिजे याकडे सरकारने विशेष लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

मराठा आणि कुणबी तुम्ही सिद्ध करू शकत नाही. मग, सख्खा भाऊ कसा सिद्ध करणार? नोंद मिळाली त्याला फायदा देणार आणि त्याच्या चुलत्याला लाभ देणार नाही. त्यामुळे ज्याची नोंद मिळाली त्याचा परिवार आणि नातेवाईक रक्ताचे असल्याने त्याचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.

ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना सरकारला वेगळे आरक्षण कसे देता येईल याचा विचार करावा. ओबीसीमध्ये मराठा पूर्वीपासून आहे आणि तुम्ही नंतर आला आहात. तू वेगळे घे आणि तिकडेच हिंड असा टोला त्यांनी छगन भुजबळ यांना लगावला. वेळ त्यांनी दिला आहे आणि त्यांनीच आता आरक्षण द्यायचे आहे. मुख्यमंत्री साहेब समाजाची नाराजी घेणार नाहीत हे मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो असेही त्यांनी सांगितले.

जे कागदावर लिहिले आहे ते त्यांच्या तज्ज्ञांनी लिहिले आहे. त्यांच्याच मंत्री मंडळातील मंत्र्यांनी लिहिले आहे. त्यांच्या प्रतिनिधींनी लिहिले आहे. त्यांचे जे अभ्यासक होते त्यांनी लिहिले आहे आम्ही नाही. त्यामुळे मुख्यमंत्री राज्यातील मराठ्यांना आरक्षण देणार ही मराठ्यांना खात्री आहे. ते प्रामाणिकपणा दाखवतील. ते खोट बोलणार नाहीत खरेच बोलतील याची आम्हाला खात्री आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मराठा आरक्षणबाबत ओबीसी दबावाचा काही संबध नाही. ते ( भुजबळ ) एकटेच आहेत. ओबीसींना वाटते गोरगरिब मराठ्यांना आरक्षण मिळावे. सरकार दबाव घेत असेल तर तो त्यांचा दबाव आहे. जर आमचा दबाव आहे त्यांचे पूर्ण आरक्षण काढून टाका. काढून टाकणार का तुम्ही? काढून टाकणार का? असे होत नसते. त्यांनी कितीही दबाव आणला तर कायदा त्यांच्या दबावाने चालत नसतो अशी टीका त्यांनी भुजबळ यांच्यावर केली.

Follow Us
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्.... शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापले
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया