AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bageshwar Baba : संत तुकाराम यांच्याविषयी माफी मागताना बागेश्वर बाबा नेमकं काय म्हणाले?

संत तुकाराम (Sant Tukaram) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे मध्य प्रदेशातील धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज ऊर्फ बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) यांनी अखेर माफी मागितली आहे.

Bageshwar Baba : संत तुकाराम यांच्याविषयी माफी मागताना बागेश्वर बाबा नेमकं काय म्हणाले?
| Updated on: Jan 31, 2023 | 9:25 PM
Share

रायपूर : संत तुकाराम (Sant Tukaram) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे मध्य प्रदेशातील धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज ऊर्फ बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) यांनी अखेर माफी मागितली आहे. बागेश्वर बाबा यांनी संत तुकाराम यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायाकडून आक्रमक प्रतिक्रिया आल्या होत्या. शिवाय महाराष्ट्रातील भाजप (BJP) नेत्यांकडूनही बागेश्वर महाराजांनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं, अशी मागणी करण्यात येत होती. तसेच इतर पक्षातील नेत्यांकडूनही बागेश्वर महाराजांच्या वक्तव्यावर निषेध व्यक्त केला जात होता. अखेर वाढता विरोध आणि टीका लक्षात घेता बागेश्वर महाराजांना उपरती झालीय. त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य मागे घेतलं आहे. संत तुकाराम हे महान संत आहेत. ते आपले आदर्श आहेत. आपल्याला कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. आपण पुस्ताकात एक गोष्ट वाचली होती. त्याचाच उल्लेख आपण केला होता. पण मी माझे शब्द मागे घेतो, अशा शब्दांत बागेश्वर महाराजांनी आपले शब्द मागे घेतले आहेत.

“संत तुकाराम महाराज हे महान संत आहेत. मी एका पुस्तकात त्यांच्याशी संबंधित एक गोष्ट वाचली होती. त्यांच्या पत्नी विचित्र स्वभावाच्या होत्या. मी त्यांच्या ऊसाच्या टिपऱ्याचीही गोष्ट एका पुस्तकात वाचली होती”, असं बागेश्वर बाबा म्हणाले.

“संत तुकारामांच्या पत्नी त्यांना एकदा ऊस आणायला पाठवतात. पण ऊस आणल्यानंतर त्याच ऊसाने त्यांच्या पत्नी त्यांना मारतात. यामध्ये ऊसाचे दोन तुकडे होतात. ही कहानी मी आपल्या परिने भाविकांना सांगितली. पण आपल्या कहाणीमुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या. त्यामुळे मी माझे शब्द मागे घेतो”, असं बागेश्वर महाराज म्हणाले.

बागेश्वर बाबा याचं वादग्रस्त वक्तव्य नेमकं काय होतं?

“संत तुकाराम महाराष्ट्रातील एक महात्मा होते. त्यांची पत्नी त्यांना रोज मारायची. रोज काठीने मारायची. कुणी तरी त्यांना विचारलं, तुम्ही रोज बायकोचा मार खाता. तुम्हाला लाज नाही वाटत का? त्यावर तुकाराम म्हणाले, मला मारहाण करणारी बायको मिळाली ही देवाचीच कृपा आहे.”

“त्यावर ती व्यक्ती म्हणाली, यात देवाची कृपा काय? तेव्हा तुकाराम म्हणाले, अरे वा… प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो. भक्तीत लीन झालो नसतो. पत्नीच्या प्रेमात पडलो असतो. मारहाण करणारी पत्नी मिळाल्याने देव मला त्याची सेवा करण्याची संधी तर देतो. प्रभू रामाच्या चरणी लीन होण्याची संधी तर देतोय….”

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.