AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pankaja Munde | परळीची शांतता आणि सुरक्षा धोक्यात! खून, मारामारी, महिला अत्याचार त्रासदायक, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली चिंता

पोलिसांसह प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याची टीका करत पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षरित्या बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांच्यावर टीका केली

Pankaja Munde | परळीची शांतता आणि सुरक्षा धोक्यात! खून, मारामारी, महिला अत्याचार त्रासदायक, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली चिंता
| Edited By: | Updated on: May 01, 2022 | 12:13 PM
Share

मुंबईः गेल्या काही महिन्यांपासून परळी शहर (Parali) आणि ग्रामीण भागात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. खून, मारामाऱ्यांसारख्या घटानंमुळे परळीची शांतता आणि सुरक्षा धोक्यात आली आहे. पोलीस आणि सत्ताधाऱ्यांचा कसलाही अंकुश या भागात राहिला नाही, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दिली. मुंबईत त्या पत्रकारांशी बोलत होत्या. सातत्याने वाढणाऱ्या घटनांमुळे कायद्याचा गुन्हेगारांवर काही धाक राहिलाय की नाही, अशी स्थिती आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पोलिसांसह प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याची टीका करत पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षरित्या बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांच्यावर टीका केली आहे.

शनिवारी युवकाची हत्या

शनिवारी परळी शहरता शैलेश राजनाळे या युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परळीत खळबळ माजली. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवला असला तरीही घटनेतील मारेकरी अद्याप फरार आहे. शुक्रवारी मिरवट येथे शेतात काम करणाऱ्या महिलेवर अत्याचाराची घटना घडली. आधीही अनेक महिन्यांपासून खून, मारामाऱ्या, महिला अत्याचार, धमकावण्यासारखे प्रकार वारंवार घडत आहेत. शहरात अशा घटनांचा उद्रेक जास्त आहे. त्यामुळे कायदा व पोलीस प्रशासनाचा कोणताही धाक गुन्हेगारांना राहिला नाही, असंच चित्र असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. अशा घटनांमुळे सर्व सामान्य नागरिक दहशतीखाली वावरत असून ही गंभीर बाब आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

माजलगावात युवकावर हल्ला

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात अन्य एका घटनेत युवकावर हल्ला झाला. सोमठाणा गावातील एका मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून एका तरुणावर गावगुंडांनी हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या हल्ल्यात तिघांना मार लागला. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसात दहा जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील सोमठाणा येथे 29 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. रात्री गावात मिरवणूक निघाली असता नाचण्यावरून वाद झाला. या हल्ल्यात राजरतन किसन भालेराव, मदन भालेराव आणि सोहम माणिक भालेराव यांना गंभीर मार लागला आहे.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.