जितेंद्र आव्हाडांना का झाले अश्रू अनावर? कारण समजल्यावर तुम्हीही मनातून हलून जाल

Beed Santosh Deshmukh murder case: आता संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आले आहे. हे फोटो जेव्हा त्यांच्या मुलांजवळ जातील. त्यांची मुले जेव्हा ते फोटो पाहतील. त्यांच्या मनावर काय परिणाम होणार?

जितेंद्र आव्हाडांना का झाले अश्रू अनावर? कारण समजल्यावर तुम्हीही मनातून हलून जाल
जितेंद्र आव्हाड
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Mar 04, 2025 | 2:26 PM

Beed Santosh Deshmukh murder case: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. घटनेच्या ८५ दिवसानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला. त्यानंतर आता विविध संघटना आणि राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात माध्यमांकडे प्रतिक्रिया दिली. त्यावेळी जितेंद्र आव्हाड भावूक झाले. ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या केली, त्याचे वर्णन करताना त्यांना आश्रू रोखता आले नाही.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

जितेंद्र आव्हाड म्हणाले, दगडाला पाझर फुटू शकतो. पण या सरकारच्या ह्रदयाला पाझर फुटू शकत नाही. संतोष देमुशख यांच्या हत्येचे फोटो पाहून राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला. अन्यथा त्यांचा राजीनामाही घेण्यात आला नसता. या प्रकरणात जातीचा आरोप केला जात आहे? या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, ज्या जातीचे धनंजय मुंडे आहेत त्याच जातीच्या मी आहे. पण माझ्या जातीने असे काही सांगितले नाही की कोणाची हत्या करा. जातीचे राजकारण स्वत:ला वाचवण्यासाठी केला जात आहे. या प्रकरणाचा आणि जातीचा काहीच संबंध नाही.

Live

Municipal Election 2026

11:16 AM

Pune Municipal Election Results 2026 : अजित पवार यांच्या पदरी निराशाच? पुण्यासह पिंपरी चिंचवड...

11:13 AM

Maharashtra Election Results 2026 : जळगावात शिंदे गटाला मोठे यश..

11:18 AM

BMC Election Results Live 2026 : मुंबईत ठाकरे बंधु आणि महायुतीमध्ये उरलं फक्त 15 जागांचं अंतर

11:12 AM

Mumbai Election Results Live 2026 : मुंबईत वॉर्ड क्रं 135, दहीसरमध्ये काय घडतय?

11:17 AM

Pune Election Results 2026 : पुण्यात भाजपची मोठी मुसंडी, 44 जागांवर आघाडी

11:13 AM

Kolhapur Election Results 2026 : कोल्हापूरमध्ये शिंदेंचा काँग्रेसला धक्का, कोण विजयी ?

जितेंद्र आव्हाड यांना आश्रू अनावर.

आव्हाडांना आश्रू अनावर

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकार काय करत होते. त्यांची हत्या करताना त्या गुंडांनी त्यांच्यावर लघुशंका केली होती. ते आम्ही सभागृहात सांगितले होते. परंतु त्यावेळी सरकारने काहीच केले नाही. आता संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आले आहे. हे फोटो जेव्हा त्यांच्या मुलांजवळ जातील. त्यांची मुले जेव्हा ते फोटो पाहतील. त्यांच्या मनावर काय परिणाम होणार? ते आयुष्यभर शांत झोपू शकणार नाही. आम्ही स्वत: ते फोटो पाहून पाच दिवसांपासून विचलित झालो आहेत, असे बोलताना जितेंद्र आव्हाड भावूक झाले.

सरकार मुंडेंना आरोपी करणार का? असा प्रश्न आव्हाड यांना विचारला. त्यावेळी ते म्हणाले, सरकार त्यांचा राजीनामा घेत नव्हते. त्यांना आरोपी काय करणार? मुंडे यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा का? या प्रश्नावर आव्हाड म्हणाले, धनंजय मुंडे यांना जनतेने निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांच्या आमदारकीचा राजीनामा का घ्यावा? असे आव्हाड म्हणाले.