Railway: बीडचे स्वप्न लवकरच साकारणार, अहमदनगरहून दोन डब्यांची रेल्वे आष्टीपर्यंत धावली, यशस्वी चाचणी!

बीडमध्ये रेल्वे येण्याचे स्वप्न लवकरच साकार होण्याचे संकेत आहेत. नगर ते आष्टी दरम्यानच्या सर्वात मोठ्या पूलावरून नुकतीच एका लहान लांबीच्या रेल्वेची चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी झाल्याने या मार्गाचे उर्वरीत कामही लवकरच वेग घेण्याची चिन्हे आहेत.

Railway: बीडचे स्वप्न लवकरच साकारणार, अहमदनगरहून दोन डब्यांची रेल्वे आष्टीपर्यंत धावली, यशस्वी चाचणी!
अहमदनगर ते आष्टीदरम्यान धावली दोन डब्यांची रेल्वे
Follow us
| Updated on: Dec 11, 2021 | 7:14 AM

बीडः जिल्ह्यातील नागरिकांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न असलेल्या नगर-बीड-परळी या 261 किलोमीटर अंतराच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम वेगात सुरु आहे. या मार्गावरील सर्वात मोठा आणि लांब असलेल्या मेहेकरी नदीवरील पुलाचे काम नुकतेच पूर्ण झाले. त्यानंतर अहमदनगर ते कडा या स्थानकांदरम्यान दोन डबे घेऊन एक रेल्वे पाठवण्यात आली. विशेष म्हणजे ही रेल्वे चाचणी यशस्वी झाली. आष्टीपर्यंत आलेली ही रेल्वे विविध गावांतील लोकांनी पाहिली. गावकरी मोठ्या कौतुकाने या रेल्वेच्या चर्चा करु लागले. लवकरच आता बीडपर्यंत रेल्वे धावण्याचे स्वप्न साकार होणार असल्याने बीडकरांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.

जिल्ह्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प!

नगर-बीड-परळी हा रेल्वेमार्ग बीड जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. 261 किमी रेल्वे मार्गाला 1995 मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यावेळी 353 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र निधीच्या अभावी प्रकल्प कित्येक वर्षे रखडला. आता 27 वर्षानंतर या प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. मागील दोन वर्षात नगर ते नारायण डोह आणि नागायण डोह ते सोलापूरवाडी अशा दोन टप्प्यांची चाचणी यशस्वी झाली. आता या मार्गात येणाऱ्या सर्वात मोठ्या कुंठेफळ येथील मेहेकरी ब्रीजचे काम पूर्ण झाले आहे. आता सोलापूरवाडी ते आष्टी या 32 किमी अंतराची चाचणी घेण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेचे उप मुख्य अभियंता विजय कुमार रॉय यांनी दिली.

लवकरच हायस्पीड रेल्वे चाचणी

येत्या काही दिवसांमध्ये नगर ते आष्टी या 60 किलोमीटर मार्गावर हायस्पीड रेल्वे चाचणी घेण्यात येणार आहे. त्याचीच पूर्वतायरी म्हणून गेल्या दहा दिवसांपासून रेल्वेचे इंजिन नगरहून आष्टीपर्यंत दररोज धावत आहे. हे इंजिन पाहण्यासाठी गावांमधील लोकांची गर्दी जमत आहे. लोक मोठ्या कौतुकाने रेल्वेची चर्चा करत आहेत.

इतर बातम्या-

धक्कादायक! अहमदनगरला निघालेल्या 22 पैकी 19 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह! काय आहे बीडमधील कोरोनाची स्थिती?

Pune : पुण्यात राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार, महादेव जानकरांची भाजपपासून फारकत?

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.