AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OBC Reservation : राज्य सरकारने नीट बाजू मांडली असती तर ही वेळ आली नसती, ओबीसी आरक्षणावरून प्रीतम मुंडेंचा हल्लाबोल

माहितीची पूर्तता न केल्यामुळेच आजचा हा दिवस उजाडला आहे. असा गंभीर आरोप खासदार मुंडे यांनी राज्य सरकारवर केला आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या निवडणुका याही ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडल्या आहेत. आता पुन्हा हीच वेळ आल्याने ओबीसी समाजात नाराजी आहे.

OBC Reservation : राज्य सरकारने नीट बाजू मांडली असती तर ही वेळ आली नसती, ओबीसी आरक्षणावरून प्रीतम मुंडेंचा हल्लाबोल
ओबीसी आरक्षणावरून प्रीतम मुंडेंचा हल्लाबोलImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: May 04, 2022 | 5:01 PM
Share

मुंबई : राज्यात सध्या हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) आणि मशीदीवरील भोंग्याचा मुद्दा गाजत असताना ओबीसी आरक्षणावरूनही पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण (OBC Reservation) पूर्वरत होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नये अशी मागणी राजकीय पक्षांकडून करण्यात आली होती. मात्र आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका या घ्याव्या लागणार आहेत. यावरून बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी राज्य सारकारबाबत नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने आपली बाजू कोर्टात व्यवस्थित मांडली असती, तर कदाचित हा धक्का बसला नसता असं म्हणत मुंडे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. माहितीची पूर्तता न केल्यामुळेच आजचा हा दिवस उजाडला आहे. असा गंभीर आरोप खासदार मुंडे यांनी राज्य सरकारवर केला आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या निवडणुका याही ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडल्या आहेत. आता पुन्हा हीच वेळ आल्याने ओबीसी समाजात नाराजी आहे.

आता तरी सरकार काय करणार?

तर पंकजा मुंडे यांनीही यावरून टीका केली आहे. मी मागे आसे म्हटले होते की ओबीसी आरक्षणाला धोका आहे आणि आज ते खरे ठरले आहेय. राज्य सरकारने आपली बाजू पूर्णपणे मांडली नाही. त्यामुळे कोर्टाने हा निर्णय घेतला आहे. माझी मागणी आहे की ओबीसी आरक्षणाशीवाय निवडणूका व्हायला नको.राज्य सरकारने राज्यापुरता निर्णय घ्यावा आणि नंतरच निवडणूका घ्याव्या. आशी माझी सरकारला विनंती आहे. तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का नसून हा धोका आहे असेही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. तर आलेला निर्णय प्रचंड निराशाजनक आहे, कारण ओबीसी आरक्षणाची बाजू मांडायला कमी पडलो, हेच सत्य आहे. आता तरी राज्य सरकार काही करणार आहे का ? असे सवालही त्यांनी केला आहे.

गुन्हेगारीचा पाढा वाचून दाखवला

तर बीडमधली कायदा आणि सुव्यवस्थेवरूनही त्यांनी हल्लाबोल केला आहे. बीड जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यापासून कायदा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. खून, दरोडे, बलात्कार आणि हाणामाऱ्यामुळे बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यस्था बिघडल्याचा आरोप खासदार प्रीतम मुंडे यांनी केला आहे. महिलांच्या सुरक्षेसंदर्भात त्यांनी बीडच्या प्रभारी पोलीस अधीक्षक पंकजा देशमुख यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार प्रीतम मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या गुन्हेगारीबद्दल पाढा वाचून दाखविला .

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.