AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कपडे धुवायला गेलेली महिला रक्ताच्या थारोळ्यात! जादूटोण्याच्या संशयावरुन विधवा महिलेचा खून

Bhandara Murder : बबिता तिरपुडे ही महिला कपडे धुण्यासाठी गेली होती. पण 28 एप्रिल रोजी तिचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला होता.

कपडे धुवायला गेलेली महिला रक्ताच्या थारोळ्यात! जादूटोण्याच्या संशयावरुन विधवा महिलेचा खून
खळबळजनक घटनाImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: May 03, 2022 | 10:12 AM
Share

भंडारा : भंडाऱ्यात विधवा महिलेचा खून (Bhandara Murder) करण्यात आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही महिला जादूटोणा करत असल्याच्या संशयातून तिचा खून करण्यात आला. डोक्यावर काठीनं जोरदार प्रहार या महिलेवर (Attack on widow women) करण्यात आला. त्यानंतर तिची गळा दाबून हत्या करण्यात आली. भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलीस (Bhandara crime news) स्थानकाअंतर्गत नवेगाव इथं ही घटना घडली. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटकही केली आहे. ही महिला रक्तबंबाळ अवस्थेत आढलून आली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या महिलेचा मृतदेह पासून परिसरातील लोक हादरुन गेले होते. ही महिला कपडे धुवायला गेली असताना हे हत्याकांड घडलं. दरम्यान, या महिलेची हत्या करण्यासाठीचं कारणंही हारवून टाकणारं आहे. आरोपींनी हत्येची कबुली देताना या महिलेचा जीव का घेतला, हे देखील सांगितलंय. या संपूर्ण घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी पोलिसांनी केली होती. त्यातून धक्कादायक खुलासा करण्यात आलाय.

का केली हत्या?

संशयतून दोघांनी या महिलेचा जीव घेतलीय. जादूटोणा करत या महिलेनं आपल्या पत्नी मारलं, असं संशय एकानं घेतला होता. त्यातूनच आरोपीनं आपल्या मित्राची मदत घेत या महिलेच्या हत्येच कट रचला. योग्य वेळ पाहून या महिलेच्या डोक्यात काठीनं वार करण्यात आले. त्यानंतर या महिलेचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील नवेगाव इथं हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

कुणी केली हत्या?

45 वर्षांच्या बबिता तिरपुडे या महिलेची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. राजहंस कुंभरे आणि विनोद रामटेके या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांनी हत्येची कबुलीही दिली आहे. अटक केलेले दोघेही जण नवेगाव कोका इथं राहणारे होते.

असा रचला हत्येचा कट

कोका वन्यजीव अभयारण्यालगत असलेल्या संरक्षित वनातील नवेगाव इथं बबिता तिरपुडे ही महिला कपडे धुण्यासाठी गेली होती. पण 28 एप्रिल रोजी तिचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, डोक्यावर काठी मारून आणि गळा दाबून तिचा खून केल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं. याप्रकरणी कारधा पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेत विचारपूस केली.

आरोपी राजहंस कुंभरे याने मृत बबिता तिरपुडे हिने जादूटोणा केल्यामुळेच त्याची पत्नी मायाबाई हिचा मृत्यू झाल्याच्या संशयातून बबिता हिच्या हत्येचा कट रचला होता. मनात राग धरून बदला घेण्यासाठी बबिता तिरपुडे हिचा खून विनोद रामटेके याच्या मदतीने केल्याची कबुली त्याने दिली. दोन्ही आरोपींना कारधा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास केला जातोय. पोलीस निरीक्ष राजेशकुमार थोरात यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

गणपती मंदिराबाहेरुन थेट आढावा : पुणे LIVE

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.