
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काल विमान अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. मुंबईहून सकाळी 8.10 ला अजित पवारांचे विमान बारामतीच्या दिशेने निघाले आणि 8.45 ला रडारवरून विमान गायब झाले. त्यापूर्वी पायलटने ATC सोबत संपर्क साधला होता. व्हिजिबिलीटी कमी असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, धावपट्टीच्या अगदी जवळ अजित पवारांच्या विमानाचा मोठा अपघात झाला. अजित पवार यांच्यासोबत विमानातील 5 जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या विमान अपघाताची चाैकशी केली जाणार असून कालच केंद्रीय पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. या विमान अपघाताचे काही व्हिडीओही व्हायरल होत आहेत. अचानक विमान एका बाजूला झुकल्याचे काही व्हिडीओंमध्ये स्पष्ट दिसत आहे. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात अहमदाबादहून उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदात झाला. त्यावेळी या भीषण अपघातातून फक्त एकच प्रवासी वाचला..
11 नंबर सीट असलेला एक प्रवासी अहमदाबादच्या विमान अपघातातून वाचला. त्यावेळीपासून विमानातील सर्वात सुरक्षित सीट हे 11 नंबरचे असल्याचे सांगितले जातंय. मात्र, अजित पवार यांच्या विमान अपघातात 11 A नंबरनेच घात केल्याचे स्पष्ट आहे. अजित पवार यांचे मुंबईहून बारामतीला निघालेले विमान बारामतीच्या धावपट्टी 11 वर उतरणार होते, तशी परवानगी देण्यात आली होती.
मात्र, धावपट्टीच्या लगत असलेल्या शेतात विमान कोसळले. बारामती विमानतळावरील 11 नंबरची धावपट्टी उंचावर आहे. ज्यामुळे येथे विमान उतरवणे म्हणजे मोठे आव्हान असते. खडकाळ भागावरील हा टेबलटॉप रनवे आहे. याच 11 नंबरच्या धावपट्टीने घात केला. ज्यावेळी हा अपघात झाला होता, त्यावेळी व्हिजिबिलीटी कमी असल्याचेही सांगितले जात आहे. पायलटने ATC ला याबाबत माहितीही दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पायलटने एक चक्कर मारली होती, त्यानंतर अचानक विमान वेगाने खाली येताना दिसत आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले जात आहे, तसा प्राथमिक अंदाज आहे. अजित पवार यांच्या विमानाच्या पायलटचा प्रचंड मोठा अनुभव होता. मात्र, अजित पवार यांच्या विमान अपघाताने देशभरात मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांचे निधन झाले, यावर अजूनही कोणाला विश्वास बसत नाही.