AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप जिल्हाध्यक्ष नियुक्त्यांवरुन ‘नाराजीनाट्य’, काँग्रेस सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या नेत्यास जिल्हाध्यक्षपद, सोशल मीडियातून रंगली चर्चा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया पूर्ण केली आहे. परंतु त्यावरुन नाराजीनाट्य समोर येऊ लागले आहे. सोशल मीडियावर काही नियुक्त्यांवर चर्चा रंगली आहे.

भाजप जिल्हाध्यक्ष नियुक्त्यांवरुन 'नाराजीनाट्य', काँग्रेस सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या नेत्यास जिल्हाध्यक्षपद, सोशल मीडियातून रंगली चर्चा
| Updated on: Jun 01, 2025 | 11:20 AM
Share

भारतीय जनता पक्षाकडून दोन आठवड्यांपूर्वी ५८ जिल्हाध्यक्ष जाहीर झाले होते. परंतु उर्वरित यादी स्थानिक मतभेदांमुळे रखडली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण व केंद्रीय नेत्यांशी चर्चा करुन यादी निश्चित करण्यात आली. आता भाजपने राज्यातील उर्वरित २२ जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर केली. परंतु यानंतरही पक्षातील मतभेद समोर येऊ लागले आहे. कधी काँग्रेसमध्ये ग्रामविकास मंत्री असलेले बसवराज पाटील यांना लातूर ग्रामीण भाजपाचे जिल्हाध्यक्ष केले आहे. ते मूळचे धाराशिव जिल्ह्यातील आहे. यावरुन सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

काँग्रेस सरकारच्या काळात मंत्री असलेले बसराज पाटील यांना भाजपने लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष केले आहे. बसवराज पाटील हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील मुरूम येथील रहिवाशी आहेत. ते 1999 साली उमरगा विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर काँग्रेस सरकारमध्ये ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले होते. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देत भाजपमध्ये आले. आता कधी मंत्री राहिलेल्या बसवराज पाटील यांच्याकडे भाजपाने लातूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षाची धुरा सोपवली. यामुळे धाराशिव जिल्ह्यातील बसवराज पाटील यांचे कार्यकर्ते ही नाराज आहेत. दुसरीकडे त्यांच्या पुर्वीच्या काँग्रेसमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही बसवराज पाटील यांच्यावर टीका सुरु केली आहे.

भाजपकडून २२ जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या

भाजपने जिल्हाध्यक्षांची रखडलेली यादी जाहीर केली आहे. पक्षातंर्गत नाराजी दूर करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी भाजपने सुरु केली आहे. भाजपने जिल्हाध्यक्षांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये या पदासाठी इच्छुक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. त्यामुळे उर्वरित नावे निश्चित करण्याआधी पुन्हा स्थानिक नेते, आमदार-खासदार आणि प्रदेश पातळीवरील नेत्यांची चर्चा झाली. परंतु आता नियुक्तीनंतरही नाराजी आहे. मुंबईतही काही नावांना विरोध झाला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया पूर्ण केली आहे. निवडणुकीत सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, यादृष्टीने सर्व संबंधितांशी प्रदेश पातळीवरून समन्वय साधण्यात येत असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.