तुकाराम मुंढे यांची बदली होणार? राज्यातील बड्या अधिकाऱ्याचे थेट विधान, अशा प्रकारच्या धक्क्यांनी..
तुकाराम मुंढे यांच्याकडून जोरदार कारवाई भेसळयुक्तांविरोधात केली जात आहे. त्यातच जनतेकडून त्यांच्या कारवाईचे जोरदार काैतुक केले जात आहे. तुकाराम मुंढे यांच्या कारवाईवर आता अश्विनी भिडे यांनी मोठे विधान केले.

अन्न सुरक्षा व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात FDA च्या कारवाया होत आहेत. इतक्या दिवसात कधीही चर्चेत नसलेला विभाग तूफान चर्चेत आला.अन्न सुरक्षा व औषध प्रशासनाकडून गुटखाविरोधात मोहिम राबलली जायची, थोड्याबहोत प्रमाणात कारवाई केली जायची.

पण तुकाराम मुंढे यांनी आपल्या हातात कारभार घेतल्यापासून राज्यभरात मोठ्या प्रमाणात कारवाया होत आहेत. हेच नाही तर मोठ्या रेस्टारंट आणि हॉटेलवर कारवाई होत आहे.

कोणाचीही गय तुकाराम मुंढे यांच्याकडून केली जात नाहीये. आता मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी तुकाराम मुंढे यांच्याकडून केल्या जाणाऱ्या कारवायांवर मोठे विधान केले. अश्विनी भिडे यांनी लोकसत्ताच्या कार्यक्रमात बोलताना म्हटले की, प्रत्येक अधिकाऱ्याची काम करण्याची पद्धत वेगळी असते.

यामुळे विविधता दिसून येते. नियमावलीनुसार सर्वांचे काम सुरू असते. पण काही वेळा समाजात बदल घडवण्यासाठी जनजागृती अशा धक्क्यांनी प्रेरणेची गरज असते. त्याशिवाय कोणत्याही विषयाची चर्चा होत नाही.

तुकाराम मुंढे हे प्रशासनातील परिपक्व अधिकारी आहेत. जनजागृतीसाठी अशा प्रकारच्या कारवाईची आवश्यकता असते. अन्यथा या विषयाकडे कोणीही लक्ष दिले नसते. 2 ते 3 वर्ष ते या पदावर असतील. ते एक मजबूत यंत्रणा राबवत आहेत, ते गेल्यानंतरही तशीच मजबूत यंत्रणा कायम राहिल.