AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपकडून हिंसा, भीती पसरविली जातेय, राहुल गांधी यांचा घणाघात

देशातील प्रत्येक भागात भाजपनं हिंसा पसरविली. भीती पसरविली आहे. या विरोधात ही यात्रा सुरू केली.

भाजपकडून हिंसा, भीती पसरविली जातेय, राहुल गांधी यांचा घणाघात
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Nov 18, 2022 | 6:57 PM
Share

शेगाव : पिकाला योग्य भाव हवा, विम्याचे पैसे हवेत,  तर शेतकरी सुखी आणि समाधानी होतील, असा सल्ला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शेगाव येथील सभेत दिला. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात संत गजानन महाराजची की जय, या शब्दानं केली. राहुल गांधी म्हणाले, ७० दिवसांपूर्वी ही यात्रा कन्याकुमारी येथून सुरू झाली. समुद्रकिनाऱ्यावर यात्रेला सुरुवात झाली. रोज २५ किलोमीटर ही यात्रा सुरू राहते. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि आता महाराष्ट्रात आहे.

विरोधी पक्षानं प्रश्न विचारला की, यात्रेची आवश्यकता का, यावर राहुल गांधी म्हणाले, देशातील प्रत्येक भागात भाजपनं हिंसा पसरविली. भीती पसरविली आहे. या विरोधात ही यात्रा सुरू केली. यात्रेचा अर्थ तुमचं म्हणणं ऐकणं आहे. तुमचं दुःख समजून घेण्याचा आहे. नफरतीमुळं लोकं तुटतात. पण, प्रेमातून लोकं जुळतात, असही त्यांनी सांगितलं.

या भागात गेल्या सहा महिन्यात कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यामागचं कारण काय. कोणत्याही शेतकऱ्याशी बोला. ते सांगतात, योग्य भाव मिळत नाही. विम्याचे पैसे भरले. एक रुपया मिळाला नाही. शेतकरी आत्महत्या का करतो. ५० हजार रुपये, एक लाख रुपयांचं कर्ज असते म्हणून.   व्यापाऱ्यांचे पैसे कसे माफ होतात. मग शेतकऱ्यांचे का नाही, असा सवालही राहुल गांधी यांनी विचारला.

विदर्भात शेतकरी आत्महत्या होत होत्या. दिल्लीतील काँग्रेस सरकारनं विदर्भाला पॅकेज दिलं होतं. दुख कसं मिटतं. प्रेम केल्यानं, गळाभेट घेतल्यानं मिटतं. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा आवाज ऐकावा. शेतकरी आत्महत्या करणार नाहीत. ते शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकतील, तर मदत करतील, अशी अपेक्षाही राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा