Chhagan Bhujbal : मनोज जरांगे यांना मदत कोणी केली? छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा मुंबईत येऊन आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. परंतु त्यामुळे मुंबईत अराजकता निर्माण होऊ शकते, असा दावा छगन भुजबळ यांनी केला. यावेळी त्यांनी गौप्यस्फोट देखील केला.

मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दौऱ्यावर निघाले आहेत. जरांगे पाटील हे सध्या पोटोद्यामध्ये आहेत. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे आता त्यांचा मुंबईचा दौरा होणार का, यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. परंतु मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दौऱ्यावर आल्यास अराजकता निर्माण होऊ शकते, अशी शक्यता मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्ती केली आहे. सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांना सरकारमधील काही लोकांनी मदत केल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला.
मंत्री छगन भुजबळ यांनी टीव्ही9 चॅनलमधील बाप्पाचे दर्शन घेतलं. त्यानंतर राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य करताना गौप्यस्फोट देखील केले. मंत्री छगन भुजबळ म्हणाले, राज्यातील मुख्य विषय गणपतीचा विषय आहे. मुंबईत आज लाखो येत आहेत, गणेश दर्शनासाठी येत आहेत. जरांगेंचं नेहमीचं उपोषण आहे. त्यांची तब्येत बिघडली आहे. मनोज जरांगे यांनी रुग्णालयात जावं. मुंबईत आज लाखोंच्या संख्येने लोक येत आहेत. आंदोलन त्यावेळेस येथे आंदोलन करणं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे एक प्रकारची अराजकता निर्माण होईल. त्यांनी घरी जाऊन थोडं आराम करावं. मनोज जरांगे पाटील कधीच कोणाचे ऐकत नाहीत’.
‘आमच्यातील मंत्री आणि आमदार त्यांच्याजवळ जातात. ते झोपलेले असतात. समोर कॅमेरे असतात. आमचे मंत्री आणि आमदार सगळे तिकडे जात असतात. विनवण्या केल्या. त्यामुळे त्यांना मोठा नेता किंवा फारचं मोठा नेता असल्याचा भास निर्माण होतो. काही वर्षांपूर्वी त्यावेळी त्या मागण्या योग्या वाटल्या. त्यावेळी सरकारमधील लोकांनी मदत देखील केली. पण आता मारूतीच्या शेपट्यासारख्या जरांगेच्या मागण्या वाढत चालल्या आहेत. शिंदे आणि फडणवीसांना शिव्या देणं यांचं सुरू झालेलं आहे. आधी मलाचं शिव्या देत होते, आता सर्वांना शिव्या देताहेत.
‘खरंतर हटवादीपणा मनोज जरांगे पाटील करत आहेत. मराठा समाजाला दिशाभूल करताहेत. स्टेजच्या येथून पाठीमागून तबांखू मळून खातात, तिथून सगळं खातो असं त्यांच्यासोबतचे लोक सांगतात. ईडब्लूएस आरक्षण सुरू केल्यानंतर अनेक राज्यातील लढा थांबला. 350 ते पावणे चारशे जातीचा वर्ग आहे. आरक्षण काही वाढणार नाही आहेत. एक वेगळं आरक्षण तुम्हाला दिलेलं आहे. मी काल मंत्रीमंडळात सांगितलेलं आहे. कुणीही काहीही असल्यास सांगावं, शिक्षणासाठी आपण सर्वांनी मदत करायला पाहिजे. हीच पुढची पिढी आहे, ही पिढी सुशिक्षित झाली पाहिजे, मनोज जरांगेकडे सुशिक्षित आणि संस्कृतपणापणा नाही आहे, अशा शब्दात भुजबळ यांनी जरांगेंना टोला लगावला.