मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांकडून गणेशोत्सव काळात डीजे बंदीचे संकेत, पुण्यातून मोठं आवाहन

सांस्कृती कार्यक्रमात होणाऱ्या डीजेच्या वापरावरून सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. अनेकांकडून डीजेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे.

मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांकडून गणेशोत्सव काळात डीजे बंदीचे संकेत, पुण्यातून मोठं आवाहन
devdra fadnvis
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 31, 2026 | 5:09 PM

सांस्कृतीक कार्यक्रमात होणाऱ्या डीजेच्या वापरावरून सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. अनेकांकडून डीजेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. पुण्यामध्ये भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे, या बैठकीमध्ये ते बोलत होते. डीजेच्या वादात न पडता, सांस्कृतीक पद्धतीने गणेश्वोत्सव साजरा करा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुणेकर गणेशोत्सव सांस्कृतिक पद्धतीने साजरा करू शकतात, असंही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस? 

सांस्कृतीक कार्यक्रमात होणाऱ्या डीजेच्या वापरावरून सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. डीजेमुळे होणारा त्रास टाळण्यासाठी डीजेवर बंदी घातली जावी अशी मागणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता पुण्यात भाजपच्या कार्यकारीणीच्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं आवहान केलं आहे. मी जेव्हा या कार्यक्रमातून बाहेर पडेल तेव्हा मीडिया मला पुण्यासंदर्भात एकच प्रश्न विचारणार आहे. तुम्ही गणेशोत्सवाचं बोललात मग गणेशोत्सवात डीजे वाजला पाहिजे की नाही? हा प्रश्न मला नक्की विचारला जाणार आहे. पण मी पुणेकरांना सांगू इच्छितो. पुण्यामध्येच ही क्षमता आहे. की संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा केला पाहिजे. हे फक्त पुणेकरच करू शकतात. माझं पुणेकरांना आवाहन आहे, डीजेच्या वादात न पडता, पुणेकरांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं पाहिजे की संपूर्ण सास्कृतीक पद्धतीने गणेशोत्सव कसा साजरा होतो? असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

विरोधकांवर हल्लाबोल 

दरम्यान भाजपच्या कार्यकारीणीच्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विरोधकांवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच पेट्रोल, डिझेल संदर्भात देखील त्यांनी मोठं विधान केलं. आज आपण संपूर्णपणे पेट्रोल, डिझेलसाठी इतर देशांवर अवलंबून आहोत. परंतु मला विश्वास आहे, की येत्या 2030 पर्यंत देशाच्या इंधनाची 50 टक्के गरज हे शेतकरी भागवतील तर 50 टक्के गरज ही ईव्हीच्या माध्यमातून भागवली जाईल, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

Follow Us