AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangali : सक्तीने ‘रोज दीडतास मोबाईल, टीव्ही बंद’, कारण…

वडगाव आणि ताकारी योजनेमुळे संपुर्ण गावाचा विकास झाला, त्यामुळे पालकांनी मुलं इंग्रजी माध्यमात टाकली.

Sangali : सक्तीने 'रोज दीडतास मोबाईल, टीव्ही बंद', कारण...
सक्तीने 'रोज दीडतास मोबाईल, टीव्ही बंद', कारण...Image Credit source: twitter
| Updated on: Sep 20, 2022 | 2:58 PM
Share

कोरोनाच्या काळात मुलं पुर्णपणे मोबाईलच्या (Mobile) आहारी गेली होती. कारण शासन दरबारी तसा आदेश काढला होता की, मुलांना डिजीटल शिक्षण (Digital Education) दिलं पाहिजे. त्यामुळे पालकांनी मुलांच्या हातात मोबाईल दिला होता. परंतु पालकांनी अभ्यासासाठी (Study) दिलेला मोबाईल मुलं इतर गोष्टीसाठी सुद्धा वापरु लागले. त्यामुळे शैक्षणिक दर्जा घसरला होता. मुलं घरी अभ्यास नीट करीत नसल्याची पालकांची सुद्धा ओरड होती.

सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील मोहित्यांचे वडगावाने एक चांगला निर्णय घेतला आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे सगळीकडे कौतुक होत आहे. गावाने घेतलेल्या बैठकीत टीव्ही आणि इंटरनेट दीड तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुलांनी पाठ्यपुस्तकांचा नीट अभ्यास करावा म्हणून ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे. सात वाजल्यापासून साडेआठवाजेपर्यंत मोबाईलचं इंटरनेट आणि टीव्ही बंद करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. विशेष म्हणजे हा निर्णय लोकांपर्यंत रोजच्यारोज पोहोचवण्यासाठी एका मंदीरावरती भोंगा सुद्धा लावण्यात आला आहे.

वडगाव आणि ताकारी योजनेमुळे संपुर्ण गावाचा विकास झाला, त्यामुळे पालकांनी मुलं इंग्रजी माध्यमात टाकली. परंतु मुलं अभ्यास करीत नसल्याची पालक ओरड करीत आहेत. त्यामुळे संपुर्ण गावाने एक बैठक बोलावली त्यामध्ये सुप्त निर्णय घेतला. त्यामुळे गावात आनंदाचं वातावरण आहे.

मुलं अभ्यासाच्यावेळी एकतर मोबाईलवरती काहीतरी पाहत असतात, तर महिला त्यांच्या आवडीच्या मालिका पाहत असतात. त्यातून मार्ग काढण्यासाठी गावाने बैठकीत निर्णय घेतला. झालेल्या बैठकीला गावातील महिला, पुरुष आणि तरुण पिढी सुद्धा उपस्थित होती अशी माहिती एका दैनिकाने छापली आहे.

त्यावेळेत मुलगा बाहेर दिसला नाही, तसेच त्याची सगळी जबाबदारी त्या पालकांची असेल. एखादा मुलगा बाहेर आढळून आल्यास त्याला अभ्यासाची आठवण करुन द्यायची जबाबदारी ग्रामपंचायत सदस्य आणि पालकांना दिली आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.