AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangali : सक्तीने ‘रोज दीडतास मोबाईल, टीव्ही बंद’, कारण…

वडगाव आणि ताकारी योजनेमुळे संपुर्ण गावाचा विकास झाला, त्यामुळे पालकांनी मुलं इंग्रजी माध्यमात टाकली.

Sangali : सक्तीने 'रोज दीडतास मोबाईल, टीव्ही बंद', कारण...
सक्तीने 'रोज दीडतास मोबाईल, टीव्ही बंद', कारण...Image Credit source: twitter
| Updated on: Sep 20, 2022 | 2:58 PM
Share

कोरोनाच्या काळात मुलं पुर्णपणे मोबाईलच्या (Mobile) आहारी गेली होती. कारण शासन दरबारी तसा आदेश काढला होता की, मुलांना डिजीटल शिक्षण (Digital Education) दिलं पाहिजे. त्यामुळे पालकांनी मुलांच्या हातात मोबाईल दिला होता. परंतु पालकांनी अभ्यासासाठी (Study) दिलेला मोबाईल मुलं इतर गोष्टीसाठी सुद्धा वापरु लागले. त्यामुळे शैक्षणिक दर्जा घसरला होता. मुलं घरी अभ्यास नीट करीत नसल्याची पालकांची सुद्धा ओरड होती.

सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील मोहित्यांचे वडगावाने एक चांगला निर्णय घेतला आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे सगळीकडे कौतुक होत आहे. गावाने घेतलेल्या बैठकीत टीव्ही आणि इंटरनेट दीड तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुलांनी पाठ्यपुस्तकांचा नीट अभ्यास करावा म्हणून ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे. सात वाजल्यापासून साडेआठवाजेपर्यंत मोबाईलचं इंटरनेट आणि टीव्ही बंद करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. विशेष म्हणजे हा निर्णय लोकांपर्यंत रोजच्यारोज पोहोचवण्यासाठी एका मंदीरावरती भोंगा सुद्धा लावण्यात आला आहे.

वडगाव आणि ताकारी योजनेमुळे संपुर्ण गावाचा विकास झाला, त्यामुळे पालकांनी मुलं इंग्रजी माध्यमात टाकली. परंतु मुलं अभ्यास करीत नसल्याची पालक ओरड करीत आहेत. त्यामुळे संपुर्ण गावाने एक बैठक बोलावली त्यामध्ये सुप्त निर्णय घेतला. त्यामुळे गावात आनंदाचं वातावरण आहे.

मुलं अभ्यासाच्यावेळी एकतर मोबाईलवरती काहीतरी पाहत असतात, तर महिला त्यांच्या आवडीच्या मालिका पाहत असतात. त्यातून मार्ग काढण्यासाठी गावाने बैठकीत निर्णय घेतला. झालेल्या बैठकीला गावातील महिला, पुरुष आणि तरुण पिढी सुद्धा उपस्थित होती अशी माहिती एका दैनिकाने छापली आहे.

त्यावेळेत मुलगा बाहेर दिसला नाही, तसेच त्याची सगळी जबाबदारी त्या पालकांची असेल. एखादा मुलगा बाहेर आढळून आल्यास त्याला अभ्यासाची आठवण करुन द्यायची जबाबदारी ग्रामपंचायत सदस्य आणि पालकांना दिली आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.