जोपर्यंत खुर्चीवर… हर्षवर्धन सपकाळ नको ते बोलून गेले, पंतप्रधानांवर बोलताना तोडल्या सर्व मर्यादा

Sapkal vs Modi : आज नाशिकच्या चांदवड तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने हमीभाव मिळावा या मागणीसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला. यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली आहे.

जोपर्यंत खुर्चीवर... हर्षवर्धन सपकाळ नको ते बोलून गेले, पंतप्रधानांवर बोलताना तोडल्या सर्व मर्यादा
Sapkal on Modi
Image Credit source: Google
| Updated on: May 26, 2026 | 2:54 PM

गेल्या काही काळापासून शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. गेल्या वर्षी झालेल्या गारपीटीमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर आता कांदा आणि इतर पिकांना कवडीमोल भाव मिळत आहे. अशातच आज नाशिकच्या चांदवड तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने हमीभाव मिळावा या मागणीसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला. कांद्याला किमान 3000 रुपये हमीभाव मिळाला तर आमचा खर्च वजा होऊन दोन पैसे हाती लागतील अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. या मोर्चा विरोधी पक्षातील अनेक नेते उपस्थित होते. यावेळी भाषणात पंतप्रधान मोदींवर टीका करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ घसरली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काय म्हणाले सपकाळ?

चांदवडमधील शेतकऱ्यांच्या मोर्चात भाषण कराताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सरकार तुपाशी शेतकरी उपाशी अशी अवस्था आहे. मी तुमचा कांदा खाल्ला आहे, मी बेइमानी करणार नाही. नालायक म्हणायचे ह**** म्हणायचे, कांदाखोर म्हणायचे, असे हे नालायक सरकार आहे. फडणवीस तर गद्दार माणूस आहे. 24 रुपयांनी कांदा खरेदीचे आश्वासन दिलेले होते. फडणवीस म्हणाले होते वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही आणि लग्न केले. त्यामुळे ते महाराष्ट्राचे खोटारडे मुख्यमंत्री आहेत.

पंतप्रधान मोदींवर टीका

पुढे बोलताना पंतप्रधान मोदींवर बोलताना सपकाळ म्हणाले की, मोदी यांनी आजू-बाजूच्या देशांसोबत **** घेतली आहे. जो पर्यंत **** खुर्चीवर आहे तो पर्यंत कांदा आयात होणार नाही. बांगलादेश श्रीलंका आपला कांदा घेणार नाही. नरेंद्र हा **** आहे. एपस्टीन फाईलमध्ये मोदींनी काय काय केलं ज्यामुळे ते ट्रम्प यांचे ऐकत आहेत? मोदींमुळे आपले चांगले होऊ शकत नाही. कांदा खरेदी आता APMC मधेच झाली पाहिजे. झोपेच सोंग करणारे खोट सरकार आहे. मोदींना बैलगाडीत बसून त्याची हिमालयात विल्हेवाट लावा.

अनेक विरोधी नेते उपस्थित

यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, शिवसेना (उबाठा) नेते अंबादास दानवे, आमदार रोहित पवार, खासदार शोभाताई बच्छाव, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर, रमेश कहांडोळे, शहराध्यक्ष बबलू खैरे तसेच महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Follow Us