मी विरोधीपक्ष नेता असतानाही ते… अजित पवारांविषयी देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. विमान अपघातामध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वांना धक्का बसला. आता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात करताना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडला.

मी विरोधीपक्ष नेता असतानाही ते... अजित पवारांविषयी देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 23, 2026 | 1:07 PM

आज, 23 फेब्रुवारी पासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. दिवंगत नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प मांडणार होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी अजित दादांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी अजितदादा जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा काय म्हणाले हे देखील सांगितले आहे.

मी विरोधी पक्ष नेता होतो तेव्हा…

अजित दादांविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दादांना एखादा निर्णय पटला नाही तर स्पष्ट सांगयचे. मंत्रीमंडळातील प्रत्येक विषयाचा नीट अभ्यास दादा करायचे. राज्याने दादांच्या रुपात न लाभलेला मुख्यमंत्री गमावला. अजितदादांनी पहिल्यांदा टायमिंग चुकवला. मी विरोधी पक्ष नेता होतो तेव्हा दादा मला मुख्यमंत्री बोलायचे. 12 वाजता कार्यक्रम असेल तर दादा पोहोचायचे 11.59ला.

मुख्यमंत्री पदाकरीता पूर्णपणे क्षमता असलेलं नेतृत्त्व

पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्राला एक जो चांगला मुख्यमंत्री मिळाला असता तो अजित दादांच्या रुपाने. ते आता आपल्यामध्ये नाहीत आणि मला विश्वास आहे की शेवटी नियतीने त्यांचे स्वप्न पूर्ण केलं असतं. त्यांच्यामध्ये ती क्षमता नक्की होती. शेवटी राजकारणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गणीतं असतात. पण क्षमतेचा जर विचार केला मुख्यमंत्री पदाकरीता पूर्णपणे क्षमता असलेलं नेतृत्त्व अजित दादांचे होते. खरं तर मी असं म्हणेल की राजकारणामध्ये आपल्याकडे अनेक नेते आहेत अनेक दादा आहेत, सगळ्याच दादांनी चांगले काम केले. पण महाराष्ट्रामध्ये वसंत दादा आणि अजित दादा ही दोन नाव अशी आहेत की ज्यांना दादा म्हणून नेहमीच महाराष्ट्र हा त्यांच्या कामाकरता याठिकाणी लक्षात ठेवेल.

“दादांनी सुधार नाईकांच्या मंत्री मंडळात जेव्हा काम केले त्यावेळी सुरुवातीच्या वेळी दादा जेव्हा मंत्री झाले त्यावेळी त्यांचा स्वभाव थोडा अबोल होता किंवा नेमकं केवढं काम करायचं अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे पहिल्यांदा त्यांचा दृष्टीकोन एका मोठ्या घराण्यातील माणूस आहे, हा मंत्री झालेला आहे. पण त्यानंतर दादांनी जेव्हा काम करायला सुरुवात केले, त्यानंतर सुधाकरराव त्यांच्या प्रत्येक वाक्यात अजित दादांचं नाव घ्यायचे. त्यातून अजित दादांचा परिचय हा काम करणारा मंत्री म्हणून झाला. बारामतीचा अपराजित नेता म्हणून दादांकडे आपण पाहातो. जनतेचं जे प्रेम दादांना मिळालं ते निश्चितपणे कोणत्याही नेत्याकरीता त्यापेक्षा मोठा दुसराही ठेवा असू शकत नाही” असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.