AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस यांनी इंदिरा नावामुळे शाळा सोडली होती, काय आहे बालपणाचा किस्सा ?

देवेंद्र फडणवीस यांच्या वर्ग शिक्षिका सावित्री अय्यर यांनी सांगितले की आपण त्याला हिंदी शिकवित होतो. तो सर्वसाधारण विद्यार्थी होता. आताही देवेंद्र त्यांना भेटल्यावर त्यांच्या पाया पडतात. ते स्वभावाने अत्यंत नम्र होते. आपल्या कामाशी काम ठेवणारे होते. त्यांना विविध विषय शिकविणारे शिक्षकांना देखील देवेंद्र यांच्याविषयी कोणतीही तक्रार नव्हती.

देवेंद्र फडणवीस यांनी इंदिरा नावामुळे शाळा सोडली होती, काय आहे बालपणाचा किस्सा ?
| Updated on: Dec 05, 2024 | 10:27 PM
Share

देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांनी आपला प्रवास नागपूरचे नगरसेवक ते महापौर म्हणून सुरु केला होता. २२ जुलै १९७० मध्ये नागपूरात जन्मलेले देवेंद्र फडणवीस यांना २२ व्या वर्षी साल १९९२ मध्ये राजकीय जीवनाला सुरुवात केली होती. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण नागपूरात झाले होते.नागपूरातील शंकर नगर स्थित सरस्वती विद्यालयात त्यांचे दुसऱ्या इयत्तेपासून प्राथमिक शिक्षण सुरु झाले. त्याआधी नागपूरच्या इंदिरा गांधी कॉन्व्हेट शाळेत त्यांना घातले होते. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये इमर्जन्सी लागू केली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधर फडणवीस यांना तुरुंगात टाकले होते. त्यामुळे त्यांच्या मनात इंदिरा गांधी यांच्याबद्दल चीड होती. फडणवीस यांनी इंदिरा कॉन्व्हेंटमधून आपले नाव काढायला भाग पाडले आणि सरस्वती शाळेत प्रवेश घेतला.

फडणवीस यांचे बालपणीचे मित्र डॉ. निशित विजय, विवेक मिश्रा, मुकुल बरानपुरे यांनी सांगितले की अभ्यासात देवेंद्र सर्वसाधारण विद्यार्थी होते. शाळेपासून एक किलोमीटरवर त्यांचे घर होते. कधी सायकलवरुन तर कधी ते पायी शाळेत जात. ते वर्गात पाठच्या बाकावर बसायचे. त्यांची वर्गमित्रांशी घट्ट मैत्री होती. त्यामुळे मित्रांच्या चुकीमुळे त्यांनाही मार बसायचा असे त्याचे मित्र सांगायचे.  फडणवीस यांच्या मित्रांनी सांगितले की एकदा त्यांच्या मित्रांनी मिळून गॅदरींगमध्ये कॉलेजच्या बाथरुममध्ये सुतळी बॉम्ब फोडले होते. त्यामुळे त्यांना शिक्षा देखील झाली होती. फडणवीस यांना समोसे खूप आवडायचे. एक रुपये पॉकेटमनी मिळायचा. त्यातून ते ५० पैशांचा समोसा खायचे. शाळेच्या शेजारील प्रिती कॉर्नर येथे ते समोसा खायचे. आजही तेथील समोसे खूप प्रसिद्ध आहेत. फडणवीस यांचा स्टाफ येथील समोसे आजही पॅक करुन त्यांच्यासाठी नेतात असे त्यांचे वर्गमित्र सांगतात.

देवेंद्र यांच्याबद्दल शिक्षकांची तक्रारच नाही

देवेंद्र फडणवीस यांचे वडील आमदार होते. परंतू ते एकदम सरळ आणि साधे होते,त्यांनी वडीलांच्या पदाचा गैरवापर करीत कधीही गर्व केला नाही. त्यांचे मोठे बंधू आशीष यांना राजकारणात रस होता. ते त्यावेळी गाणी देखील म्हणायचे. फडणवीस यांच्या वर्गमित्रांचे मागे संमेलन झाले तेव्हा फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता या दोघांनी गाणी म्हटली आणि खूप एन्जॉय केले. ते कधीच मस्ती करायचे नाहीत. त्यांच्या मित्रांना शाळेत अनेकदा कोंबडा बनविले होते. परंतू फडणवीस यांना कधी अशा प्रकारची शिक्षा झालेली नसल्याचे त्यांचे मित्र सांगतात. सामुहीकपणे खोडसाळपणा केल्याने मात्र त्यांना शिक्षा झाल्या आहेत.

मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.