AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वोच्च न्यायालयाचा सत्ता संघर्षावर निकाल, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया काय ?

राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा सत्ता संघर्षावर निकाल, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया काय ?
Image Credit source: tv9
| Updated on: May 11, 2023 | 2:06 PM
Share

मुंबई : राज्याच्या सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अनेक निरीक्षणे नोंदवली. व्हीप, राज्यपालांची भूमिका आणि प्रतोद या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाच्या टिपण्या केल्या. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आला आहे. त्यावर आम्ही पूर्ण समाधानी आहोत. दुपारी मुख्यमंत्र्यांसोबत पत्रकार परिषद घेणार आहोत, त्यामध्ये निकालावर अधिक विश्लेषण करू. मात्र सध्या मला एवढंच सांगायचं आहे की, जे लोक कालपर्यंत सरकार जाणार म्हणून उड्या मारत होते त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं आहे. त्यांनी वेगवेगळ्या चर्चा केल्या त्या किती थोतांड होत्या हेही दिसून आलं आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

बाकीचे विश्लेषण पत्रकार परिषदेत करू, असेही ते म्हणाले.

न्यायालयाच्या निकालाचं स्वागत करतो, आमची बाजू सत्याची – शंभुराज देसाई

सत्तासंघर्षाच्या निकाला नंतर मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाने दिलेला निर्णयाचं स्वागत आम्ही करत असुन हा विजय सत्याचा असल्याचं शंभुराज देसाई यांनी सांगितलं. आम्ही जनतेत जाऊन काम करत आहोत, जनतेच्या सोबत आहोत हे यातुन अधोरेखीत झाल्याचं शंभुराज देसाई यांनी नमूद केलं. उद्धव ठाकरे आणि विरोधक सांगत होते आमदार आणि मुख्यमंत्री अपात्र होणार आणि सरकार ढासळणार मात्र आम्हाला कोर्टाच्या निकालावर विश्वास होता. संजय राऊत यांच्या बोलण्याकडं आम्ही लक्ष देत नाही असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला यामुळं त्यांच सरकार गेलं हे सुप्रीम कोर्टाचं निरिक्षण आहे .

संजय राऊतांनी आता गुवाहाटीच्या जंगलात जावे – शहाजीबापू पाटील

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आमदार शहाजीबापू पाटलांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कोर्टाने लोकशाही टिकवाण्याचे काम केले त्याबद्दल कोर्टाचे आभार मानतो, असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने केवळ सरकारच नव्हे तर आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना काँग्रेस- राष्ट्रवादीच्या घश्यात जाण्यापासून वाचवल्याचेही त्यांनी नमूद केले.

संजय राऊतांनी आता गुवाहाटीच्या जंगलात जावे आणि नरहरी झिरवळ यांनी झुरळ पकडायला जावे असा खोचक सल्ला त्यांनी दिला.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.