AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“बटेंगे तो कटेंगे हे सत्य, इतकी मिरची…” देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कोणाकडे?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली.

बटेंगे तो कटेंगे हे सत्य, इतकी मिरची... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कोणाकडे?
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीImage Credit source: Facebook
| Updated on: Nov 18, 2024 | 10:30 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात कटेंगे तो बटेंगे, बटेंगे तो कटेंगे या गोष्टींची चर्चा पाहायला मिळत आहे. सत्ताधाऱ्यांनी याबद्दल एक विधान केले होते. त्यावरुन विरोधकांनी टीका केली होती. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत कटेंगे तो बटेंगे, बटेंगे तो कटेंगे आणि एक रहेंगे तो सेफ रहेंगे यावर एक प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? 

“कटेंगे तो बटेंगे, बटेंगे तो कटेंगे यात काय चूक आहे. या देशाचा इतिहास बघा, या देशात जेव्हा जेव्हा आम्ही प्रांत, भाषा, देश, जातींमध्ये विभागलो गेलो तेव्हा तेव्हा हा देश गुलाम झाला. देश कटला, माणूस कटला. त्यामुळे बटेंगे तो कटेंगे हे सत्य आहे. त्यापेक्षा जास्त सत्य काय एक रहेंगे तो सेफ रहेंगे यावर इतकी मिरची लागण्याचे कारण काय? मी समाजाला एक राहा असे सांगतोय, मग तुम्हाला इतकी मिरची का लागते? यामुळे यात काहीही आक्षेपार्ह नाही. मला यात काही आक्षेपार्ह आहे हे दाखवून द्याव”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“देशाचे पंतप्रधान जर एकत्र राहा म्हणजे आपण सेफ राहू असे सांगत असेल तर त्यात चुकीचे काय. कोणत्याही देशाचा पंतप्रधान एकत्र राहा तर सुरक्षित राहू, असेच सांगत असेल तर त्याची मिरची लागण्याचे कारण काय. शरद पवारांमध्ये लपलेला जातीवाद हा उफाळून येतो”, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

योगी आदित्यनाथ यांनी दिलेला नारा

दरम्यान काही दिवसांपूर्वी पुण्यातील भोसरीत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा पार पडली होती. या सभेत त्यांनी ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’चा नारा दिला होता. ‘बटे थे तब कटे थे, अब बटेंगे नही. एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ अशी भावना व्यक्त केली होती. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन भारत निर्माण झाला असून, ‘सबका साथ, सबका विकास’ सुरू आहे. काेणामध्ये भेदभाव नसल्याचे सांगत त्यांनी एकीकरणाचे आवाहन केले.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.