AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“बटेंगे तो कटेंगे हे सत्य, इतकी मिरची…” देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कोणाकडे?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली.

बटेंगे तो कटेंगे हे सत्य, इतकी मिरची... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कोणाकडे?
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीImage Credit source: Facebook
| Updated on: Nov 18, 2024 | 10:30 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात कटेंगे तो बटेंगे, बटेंगे तो कटेंगे या गोष्टींची चर्चा पाहायला मिळत आहे. सत्ताधाऱ्यांनी याबद्दल एक विधान केले होते. त्यावरुन विरोधकांनी टीका केली होती. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत कटेंगे तो बटेंगे, बटेंगे तो कटेंगे आणि एक रहेंगे तो सेफ रहेंगे यावर एक प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? 

“कटेंगे तो बटेंगे, बटेंगे तो कटेंगे यात काय चूक आहे. या देशाचा इतिहास बघा, या देशात जेव्हा जेव्हा आम्ही प्रांत, भाषा, देश, जातींमध्ये विभागलो गेलो तेव्हा तेव्हा हा देश गुलाम झाला. देश कटला, माणूस कटला. त्यामुळे बटेंगे तो कटेंगे हे सत्य आहे. त्यापेक्षा जास्त सत्य काय एक रहेंगे तो सेफ रहेंगे यावर इतकी मिरची लागण्याचे कारण काय? मी समाजाला एक राहा असे सांगतोय, मग तुम्हाला इतकी मिरची का लागते? यामुळे यात काहीही आक्षेपार्ह नाही. मला यात काही आक्षेपार्ह आहे हे दाखवून द्याव”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“देशाचे पंतप्रधान जर एकत्र राहा म्हणजे आपण सेफ राहू असे सांगत असेल तर त्यात चुकीचे काय. कोणत्याही देशाचा पंतप्रधान एकत्र राहा तर सुरक्षित राहू, असेच सांगत असेल तर त्याची मिरची लागण्याचे कारण काय. शरद पवारांमध्ये लपलेला जातीवाद हा उफाळून येतो”, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

योगी आदित्यनाथ यांनी दिलेला नारा

दरम्यान काही दिवसांपूर्वी पुण्यातील भोसरीत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा पार पडली होती. या सभेत त्यांनी ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’चा नारा दिला होता. ‘बटे थे तब कटे थे, अब बटेंगे नही. एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ अशी भावना व्यक्त केली होती. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन भारत निर्माण झाला असून, ‘सबका साथ, सबका विकास’ सुरू आहे. काेणामध्ये भेदभाव नसल्याचे सांगत त्यांनी एकीकरणाचे आवाहन केले.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.