AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“बटेंगे तो कटेंगे हे सत्य, इतकी मिरची…” देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कोणाकडे?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली.

बटेंगे तो कटेंगे हे सत्य, इतकी मिरची... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कोणाकडे?
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीImage Credit source: Facebook
| Updated on: Nov 18, 2024 | 10:30 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात कटेंगे तो बटेंगे, बटेंगे तो कटेंगे या गोष्टींची चर्चा पाहायला मिळत आहे. सत्ताधाऱ्यांनी याबद्दल एक विधान केले होते. त्यावरुन विरोधकांनी टीका केली होती. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत कटेंगे तो बटेंगे, बटेंगे तो कटेंगे आणि एक रहेंगे तो सेफ रहेंगे यावर एक प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? 

“कटेंगे तो बटेंगे, बटेंगे तो कटेंगे यात काय चूक आहे. या देशाचा इतिहास बघा, या देशात जेव्हा जेव्हा आम्ही प्रांत, भाषा, देश, जातींमध्ये विभागलो गेलो तेव्हा तेव्हा हा देश गुलाम झाला. देश कटला, माणूस कटला. त्यामुळे बटेंगे तो कटेंगे हे सत्य आहे. त्यापेक्षा जास्त सत्य काय एक रहेंगे तो सेफ रहेंगे यावर इतकी मिरची लागण्याचे कारण काय? मी समाजाला एक राहा असे सांगतोय, मग तुम्हाला इतकी मिरची का लागते? यामुळे यात काहीही आक्षेपार्ह नाही. मला यात काही आक्षेपार्ह आहे हे दाखवून द्याव”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“देशाचे पंतप्रधान जर एकत्र राहा म्हणजे आपण सेफ राहू असे सांगत असेल तर त्यात चुकीचे काय. कोणत्याही देशाचा पंतप्रधान एकत्र राहा तर सुरक्षित राहू, असेच सांगत असेल तर त्याची मिरची लागण्याचे कारण काय. शरद पवारांमध्ये लपलेला जातीवाद हा उफाळून येतो”, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

योगी आदित्यनाथ यांनी दिलेला नारा

दरम्यान काही दिवसांपूर्वी पुण्यातील भोसरीत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा पार पडली होती. या सभेत त्यांनी ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’चा नारा दिला होता. ‘बटे थे तब कटे थे, अब बटेंगे नही. एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ अशी भावना व्यक्त केली होती. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन भारत निर्माण झाला असून, ‘सबका साथ, सबका विकास’ सुरू आहे. काेणामध्ये भेदभाव नसल्याचे सांगत त्यांनी एकीकरणाचे आवाहन केले.

Follow Us
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका.