Devendra Fadnavis : भाजपाचं सर्वात मोठं धक्कातंत्र, आता फडणवीसांना केंद्रात थेट…बड्या नेत्याच्या थेट विधानाने एकच खळबळ!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी वाढलेली आहे. या सर्व घडामोडी लक्षात घेत लवकरच काहीतरी मोठं होऊ शकतं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. असे असतानाच आता देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या केंद्रातील संभाव्य मंत्रिपदाबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सर्वात मोठं विधान केलं आहे.

Devendra Fadnavis : धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्रात बऱ्याच घडामोडी वाढल्या आहेत. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच देशाचे नवे शिक्षणंत्री असतील, असा दावा केला जात होता. राज्यात तशी चर्चा केली जात होती. गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी वाढलेली आहे. या सर्व घडामोडी लक्षात घेत लवकरच काहीतरी मोठं होऊ शकतं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. असे असतानाच आता देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या केंद्रातील संभाव्य मंत्रिपदाबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सर्वात मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
फडणवीस लवकरच दिल्लीत जाणार?
या क्षणी देशात उत्तम शिक्षणमंत्री कोण होऊ शकेल तर ते नाव हे देवेंद्र फडणवीस यांचं आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील ते माहिती आहे. माझ्या माहितीनुसार याबाबत मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. तुम्ही केंद्रात या. तुम्ही मनुष्यबळ विकासमंत्री व्हावे. या खात्याची जबाबदारी तुम्ही घ्यावी, असे मोदी यांनी फडणवीस यांना सांगितलं असल्याचा दावा राऊत यांनी केला.
माझ्या माहितीप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांना एक आश्वासन दिलं आहे. तुम्ही केंद्रात या, राज्यात तुमच्या पसंतीचा मुख्यमंत्री नेमला जाईल, असं मोदींनी फडणवीसांना सांगितल्याचाही दावा राऊतांनी केला.
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातच राहणार
राज्यातील महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊतांच्या या दाव्यावर टीका केली. राऊत यांना हा तिसरा डोळा कुठून मिळाला काय माहिती. त्यांना कोणी तिसरा डोळा दिलेला असेल तर ते मला माहिती नाही. राऊत जे बोलत आहेत, तसं काहीही होणार नाही. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील मजबूत असे मुख्यमंत्री आहेत. विकसित महाराष्ट्राचे स्वप्न हे देवेंद्र फडणवीस हेच बघू शकतात. म्हणूनच राऊत यांच्या बोलण्याला काहीही अर्थ नाही.
